शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

ज्याच्या नाही ललाटी, तो करी तलाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 6:08 AM

सफाळे जवळील माकूणसार गावातील सर्वे नंबर १८० या साडेसात एकर जमिनीवर दुसºयाच व्यक्तीच्या नावे पीकपाणी नोंद केली असल्याचा प्रताप पालघर तहसील कार्यालयातील एका अव्वल कारकुनाच्या मदतीने तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी ह्याने केला असून जिल्हाधिका-यानी तात्काळ या प्रकरणातील दोन्ही दोषींवर कडक कारवाईची मागणी माकूणसार ग्रामस्थांनी केली आहे.

- हितेन नाईकपालघर -  सफाळे जवळील माकूणसार गावातील सर्वे नंबर १८० या साडेसात एकर जमिनीवर दुसºयाच व्यक्तीच्या नावे पीकपाणी नोंद केली असल्याचा प्रताप पालघर तहसील कार्यालयातील एका अव्वल कारकुनाच्या मदतीने तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी ह्याने केला असून जिल्हाधिका-यानी तात्काळ या प्रकरणातील दोन्ही दोषींवर कडक कारवाईची मागणी माकूणसार ग्रामस्थांनी केली आहे.काही दिवसांपूर्वी एका ति-हाइत व्यक्ती मार्फत या जागेवर अचानक तारेचे कुंपण घालून तो बळकावण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता त्याने कुंपण घातले व हा भूखंड बळकावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्या लगत असलेल्या माकूणसार खाडीचे खारे पाणी शिरून ही जमीन नापीक व पडीक होती. मात्र, अचानक ती लागवडी खाली असल्याचा देखावा करून तेथे शेती करत असल्याचा बनाव जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाºया व्यक्तिमार्फत रचण्यात आला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला असून ही जमीन पूर्वी पडीक होती आणि अचानक ती पिकपाण्याखाली आली कशी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकूनानी या पीकपाणीच्या नोंदी स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी केल्या असून त्यावेळचे तलाठी रत्नदीप दळवी यांनी तशा नोंदी व फेरफार केल्या असल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.हा भूखंड हा खाडी पात्राच्या जवळ असल्यामुळे येथील खारे पाणी या भूखंडावर पसरत असल्यामुळे नजीकच्या शेतकºयांच्या जमिनीचे त्यापासून रक्षण होते. परंतु आता या भूखंडावर मोठे बांध बांधण्यात आल्याने खाडीचे खारे पाणी थेट शेतीमध्ये जाऊन जमिनी नापीक होण्याचा धोका वाढला आहे. तसेच सदर इसमाने माकूणसार पूर्वेकडून पश्चिमेकडे खाडीपात्रात जाणाºया नैसिर्गक नाल्याच्या मार्गात मोठा बांध घालून या नैसिर्गक नाल्याचा मार्ग पूर्णत: बंद केला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी माकुणसार पालघर मुख्य रस्त्यावर साचून माकूणसार आणि लगतच्या २० गावांचा संपर्कतुटण्याची भीती व्यक्त होत आहे.या भूखंडावरील सर्व बेकायदेशीर कामाविरोधात माकूणसार ग्रामस्थानी या विरोधात ग्रामपंचायत सभेत ठरावही घेण्यात आला आहे. याप्रकरणी प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून संबंधित भूखंडावरील सर्व अतिक्र मण दूर करण्याची आणि सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावर महसूल विभाग आणि प्रशासन यावर काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.येथील नैसिर्गक नाला बंद केल्याने शेतकºयांचे फार मोठे नुकसान होणार आहे. या इसमाविरोधात व या बेकायदेशीर कामाविरोधात ग्रामस्थांनी मिळून ग्रामसभेत याविरोधी ठराव घेतलेला आहे.- जयंत पाटील, सरपंचसंजय दुबे नामक व्यक्तींनी पीकपाणी नोंद केली असल्याचे प्राथमिक स्तरावरून आढळून येत असून ह्या प्रकरणाचा अहवाल तहसीलदारांकडे सादर करणार आहे.- गौरंग बंगारा, मंडळ अधिकारी,

टॅग्स :Vasai Virarवसई विरार