शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:15 IST

वाडा तालुक्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असून या परतीच्या पावसाने शेतात कापून ठेवलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाडा : वाडा तालुक्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असून या परतीच्या पावसाने शेतात कापून ठेवलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेत असल्याने शेतकरी हवालिदल झाले असून त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

वाडा तालुक्यातील वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. यंदा पाऊस समाधानकारक पडला असल्याने उत्पन्न चांगले आहे. मात्र, परतीच्या पावसाने हे सोन्यासारखे पीक उद्ध्वस्त केले आहे. दरम्यान, तीन - चार दिवसांपूर्वी कडक उन पडल्याने शेतकºयांनी जव्हार, मोखाडा येथून मजूर आणून भाताची कापणी सुरू केली होती. कापणी केलेल्या भाताचे कडपे दोन दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवले. मात्र, दोन दिवसांपासून रिमझीम पडत असलेल्या पावसाने ही रोपे भिजली असून काही ठिकाणी ती तरंगत आहेत. लोंगामधील भाताचे दाणे परिपक्व असल्याने या दाण्यांना शेतातच कोंब फुटू लागले आहेत.

परतीच्या पावसाने शेतकºयांचे मोठे नुकसान होत असताना प्रशासन निवडणुकीच्या कामात आहे. त्यामुळे या नुकसानीची दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांच्याशी संपर्क साधला असता मी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगून अधिक बोलणे टाळले.

अवकाळी पावसाने भातपिकांचे नुकसान

तलासरी : शुक्र वारी संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह तलासरी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने भात पिकाचे नुकसान झाले. शेतात भात पीक तयार झाल्याने शेतकºयांनी त्याची कापणी सुरू केली. कापलेले पीक शेतात सुकण्यासाठी ठेवले असता संध्याकाळी आलेल्या जोरदार पावसाने ते भिजून गेले.

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला असला तरी संततधार पावसाने अनेक शेतकºयांचे भात पीक कुजून गेले. जे काही हाती राहिले आहे त्याची कापणी सुरू असतानाच परतीचा पाऊस जोरदार पडत असल्याने हे कापलेले पीकही वाया जात असल्याने भागातील शेतकरी हवालदील झाला आहे.

दरम्यान, या परतीचा पावसाचा फटका राजकरण्यांनाही बसतो आहे. दोन दिवसांवर मतदान आल्याने कार्यकर्ते दारोदारी मतदारांना भेटत आहे पण जोरदार पावसाने त्यांना प्रचारात अडचणी येत आहेत.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी