शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:15 IST

वाडा तालुक्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असून या परतीच्या पावसाने शेतात कापून ठेवलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाडा : वाडा तालुक्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असून या परतीच्या पावसाने शेतात कापून ठेवलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेत असल्याने शेतकरी हवालिदल झाले असून त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

वाडा तालुक्यातील वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. यंदा पाऊस समाधानकारक पडला असल्याने उत्पन्न चांगले आहे. मात्र, परतीच्या पावसाने हे सोन्यासारखे पीक उद्ध्वस्त केले आहे. दरम्यान, तीन - चार दिवसांपूर्वी कडक उन पडल्याने शेतकºयांनी जव्हार, मोखाडा येथून मजूर आणून भाताची कापणी सुरू केली होती. कापणी केलेल्या भाताचे कडपे दोन दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवले. मात्र, दोन दिवसांपासून रिमझीम पडत असलेल्या पावसाने ही रोपे भिजली असून काही ठिकाणी ती तरंगत आहेत. लोंगामधील भाताचे दाणे परिपक्व असल्याने या दाण्यांना शेतातच कोंब फुटू लागले आहेत.

परतीच्या पावसाने शेतकºयांचे मोठे नुकसान होत असताना प्रशासन निवडणुकीच्या कामात आहे. त्यामुळे या नुकसानीची दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांच्याशी संपर्क साधला असता मी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगून अधिक बोलणे टाळले.

अवकाळी पावसाने भातपिकांचे नुकसान

तलासरी : शुक्र वारी संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह तलासरी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने भात पिकाचे नुकसान झाले. शेतात भात पीक तयार झाल्याने शेतकºयांनी त्याची कापणी सुरू केली. कापलेले पीक शेतात सुकण्यासाठी ठेवले असता संध्याकाळी आलेल्या जोरदार पावसाने ते भिजून गेले.

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला असला तरी संततधार पावसाने अनेक शेतकºयांचे भात पीक कुजून गेले. जे काही हाती राहिले आहे त्याची कापणी सुरू असतानाच परतीचा पाऊस जोरदार पडत असल्याने हे कापलेले पीकही वाया जात असल्याने भागातील शेतकरी हवालदील झाला आहे.

दरम्यान, या परतीचा पावसाचा फटका राजकरण्यांनाही बसतो आहे. दोन दिवसांवर मतदान आल्याने कार्यकर्ते दारोदारी मतदारांना भेटत आहे पण जोरदार पावसाने त्यांना प्रचारात अडचणी येत आहेत.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी