शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वसईत भाजपाला ‘दे धक्का’; ख्रिस्ती पदाधिकाऱ्यांचा सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:26 IST

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाने वसईत महापालिकेतून २९ गावे वगळण्याबाबत शपथपत्र देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

वसई : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाने वसईत महापालिकेतून २९ गावे वगळण्याबाबत शपथपत्र देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, निवडणूक जिंकताच त्यांना त्याचा विसर पडल्यामुळे बुधवारी वसईतील भाजपाच्या ख्रिस्ती पदाधिकाºयांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातून गावे वगळण्याच्या मुद्यावर तालुक्यात अनेक आंदोलने झालीत. वसईकरांना पोलिसांचा लाठीमारही सहन करावा लागला. तुरुंगवासही भोगावा लागला. याच मुद्यावर विधानसभा निवडणुका जिंकून विवेक पंडीत आमदार झाले आणि याच मुद्यावर त्यांचा दारूण पराभवही झाला. त्यानंतरच्या काळात अनेक आंदोलनकर्ते आपल्या अस्तित्वाची लढाई लढत विविध पक्षात सामिल झाले. काहींनी स्वतंत्रपणे दबाव गट तयार केला, वेगळ्या संघटना स्थापन केल्या. अशा अनेक उलथापालथी गेल्या काही वर्षात वसईच्या राजकारणात घडल्या आहेत.खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभेची पोटनिवडणूक मे २०१८ ला घेण्यात आली. त्यावेळी प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दोन सभा वसई-नालासोपारा येथे व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा विरारमध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी फडणवीस यांनी २९ गावे वगळण्याच्या प्रक्रियेबाबत अनुकूल शपथपत्र देतो असे आश्वासनाचे गाजर वसईकरांना दाखवले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन अखेर फोल ठरले.निवडणुकीच्या आठ महिन्यानंतरही गावे वगळण्याच्या मुद्दा कायम असल्यामुळे आता वसईतील भाजपाच्या ख्रिस्ती पदाधिकाºयांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव रिक्सन तुस्कानो, अल्पसंख्याक अध्यक्ष विजय तुस्कानो, वॉर्ड अध्यक्ष डेरिक डाबरे,जिल्हा युवा चिटणीस स्टीफन परेरा, आगाशीचे वॉर्ड अध्यक्ष राबर्ट लोपीस, विभाग प्रमुख डेव्हिक मच्याडो, आल्फेड मच्याडो यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली आहे.मिलिंद खानोलकर सेनेच्या वाटेवर इतर पदाधिकारीही नाराजजनआंदोलन समितीतून त्यावेळी असलेले मिलिंद खानोलकर यांनी मात्र शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय जाहिर करून ते जनआंदोलन समितीतून बाहेर पडले. ‘मी वसईकर’ अभियानामार्फत स्वत:चे अस्तित्व टिकवत ते वसईच्या राजकारण व समाजकारणात पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांना २९ गावे पालिकेतून वगळण्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी केली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येईल असे सांगितल्यानंतरही न्यायालयीन प्रक्रि या सुरू झालेली नाही. आठ महिने उलटूनही मुख्यमंत्र्यांनी वसईकर मतदारांना दिलेल्या आश्वासनाबाबत शासनाच्यावतीने ठोस पाऊल उचलले गेले नसल्याची खंत त्यांनी लोकमतकडे बोलून दाखवली.आम्ही भाजपा सोडला नाही मात्र, मुख्यमंत्र्यांनी वसईकरांना दिलेले वचन पाळावे. २९ गावे पालिकेतून वगळावी हिच आमची मागणी आहे.- विजय तुस्कानो,अल्पसंख्याक अध्यक्ष, भाजपावसईकरांच्या गावे वाचवा लढ्याचे मुख्यमंत्री स्व:ता साक्षीदार आहेत. विरोधी पक्षात असतानाही त्यांनी विधीमंडळात या लढ्याचे समर्थन केले होते. त्यांनी तात्काळ आपल्या स्तरावर पावले उचलावीत. -मिलिंद खानोलकर,‘मी वसईकर’ अभियान२९ गावाचा तिढा सोडविण्यासाठी जो पक्ष आम्हाला सहकार्य करील, त्यांच्या बाजूने आम्ही आहोत. ग्रामीण २१ हजार मतदार आमच्यासोबत आहेत.- रिक्सन तुस्कानो,भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव

टॅग्स :BJPभाजपा