शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

वसई किल्ल्याचे पावित्र्य संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 2:20 AM

मराठा साम्राज्याचे चिन्ह असणा-या वसईच्या किल्ल्यामध्ये येणारे हौशी पर्यटक, प्रेमी युगुले, दारुडे व प्रि-वेडिंग कपल्सच्या धिंगाण्यामुळे दुर्ग प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

नालासोपारा : पोर्तूगीजांच्या जुलमी अत्याचारापासून वसईकरांची मक्तता करुन रयतेला आश्वस्त करणाऱ्या नरवीर चिमाजी आप्पाच्या येथील स्मारकाचे पावित्र्य संकटात आले आहे. मराठा साम्राज्याचे चिन्ह असणा-या या किल्ल्यामध्ये येथे येणारे हौशी पर्यटक, प्रेमी युगुले, दारुडे व प्रि-वेडिंग कपल्सच्या धिंगाण्यामुळे दुर्ग प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.हा जंजिरा महाराष्ट्रातील दुर्गमित्रांसाठी व वसईकरांसाठी अभिमानाचे प्रतिक आहे. या स्मारकाचा वसई विरार महानगरपालिका अंतर्गत वेळोवेळी विविध माध्यमातून सुशोभिकरणाचा प्रयत्न सुरू असतो. वसईतील पोर्तुगीजांची जुलमी सत्ता उलथवून टिकण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी वसईवर आक्र मण केले. वसईचा रणसंग्राम व मिळवलेला विजय हा हजारो मराठ्यांच्या रक्ताने लिहीला गेला आहे. त्यामूळे इतिहासात त्याला मानाचे स्थान आहे. या गोष्टीला आता तीन शतके उलटली आहेत.मात्र, या ठिकाणी येणाºया पर्यटकांना स्मारकाचे महत्व सांगणारा व स्पष्ट नियमावली सांगणारा एकही फलक नसल्याने सध्या येथे स्वैर कारभार सुरू आहे. त्यात किल्ल्यातील इतर भागापेक्षा स्मारक परिसर स्वच्छ असल्याने प्रेमीयुगले व दारु बाजांना हे ठिकाण आयते मिळाले आहे. याला पायबंद घालण्यासाठी वसई- विरार महानगरपालिकेने या स्मारकाचे महत्त्व लक्षात घेऊन या ठिकाणी कायमस्वरूपी व योग्य गणवेश, ओळखपत्र असणारी व्यक्ती नियुक्त करणे अत्यंत गरजेचे असल्याचे दुर्गप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.शेकडो एकर परिसर असलेल्या या भूईकोट किल्ल्यात सद्या प्रि-वेडिंग छायाचित्रे नावाने सुरू असणारी नवी संस्कृती ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य नष्ट करण्यासाठी पुढे सरसावत आहे. येथील स्मारक रोज सकाळी स्थानिक मंडळींच्या व्यायामासाठी व योग साधनेसाठी उपयोगात येते. सध्या स्मारकात यासाठी कोणतीच व्यवस्था नाही.स्मारकातील काही भागात दुर्गमित्रांच्या अभ्यासिकेची व्यवस्था, बालगोपाल वर्ग उद्यान, ढोल ताशा पथकाच्या सरावाची व सरावाच्या साधनांची व्यवस्था, अभ्यास सफरीची चर्चा-संवाद व्यवस्था, चिमाजी अप्पांच्या ऐतिहासिक वाटचालीची फलक स्वरूपात माहिती, अभ्यासकांनी तयार केलेली विशेष टिपणे नोंदी, मोडीपत्रे भाषांतरे, वसई मोहिमेतील नरवीरांच्या स्मृती जपणारी पूजनीय स्मारकशिळा किंवा स्मृतीस्तंभ, जंजिरे वसई किल्ल्याची प्रतिकृती, जंजिरे वसई किल्ल्याची थोडक्यात माहिती, स्मारकाची स्वच्छता व संरक्षण करणारे सुरक्षारक्षक, स्मारकास भेट देण्यास वेळेचे योग्य बंधन, चांगल्या सुशोभित फुलझाडांची लागवड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय व्यवस्था इत्यादी सोप्या लहान स्वरूपाच्या उपक्र मांनी नरवीर चिमाजी स्मारक प्रत्येकास हवेहवेसे आपलेसे वाटेल.गेल्या कित्येक वर्षांपासून किल्ले वसई मोहीम परिवार व समस्त दुर्गमित्र परिवार अंतर्गत वृक्षारोपण, श्रमदान, इतिहास सफर, चर्चासत्र, नरवीरांची पुण्यतिथी, दीपोत्सव, विजयदिन अशा असंख्य उपक्र मासाठी नरवीरांच्या स्मारकात एकत्र येतात. हे स्मारक म्हणजे जंजिरे वसईच्या विजयाची अस्मिता आहे. किल्ले वसई मोहीम परिवाराने गेली एक वर्ष दर सोमवारी नियमितपणे चिमाजी अप्पा स्मारकात दिपपूजन करण्याचा उपक्र म पूर्ण केला. मात्र, इतिहासाची जाण नसणाºयांनी किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करणे सुरु केले आहे.स्थानिक दुर्गमित्र व महानगरपालिकेच्या सहकार्याने नरवीरांचे स्मारक पूजनीय ठरण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मराठ्यांच्या वसई मोहिमेच्या स्मृती जपून येणाºया पुढील पिढीस एक आदर्श निर्माण ठरू शकेल यासाठी दुर्गिमत्रांनी आता संवर्धनासाठी पूढे यायला हवे.-डॉ. श्रीदत्त राऊत,इतिहास अभ्यासकव दुर्गमीत्र

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFortगड