शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आज मुख्यमंत्री घेणार विरोधकांचा समाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:05 IST

पालघर लोकसभा : भाजपाच्या वतीने मोर्चेबांधणी

पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. रविवारी होणाऱ्या आपल्या दोन जाहीर सभांमध्ये मुख्यमंत्री जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने काय भाष्य करतात आणि कोणत्या मुद्यांवरून विरोधकांवर टीकेची झोड उठवतात, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.आतापर्यंत राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक म्हणून एकहाती किल्ला लढवून विजयश्री खेचून आणणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन जाहीर सभांनी भाजपच्या निवडणुक प्रचार मोहिमेत रंग भरले जाणार आहेत. रविवार दिनांक २० मे रोजी सकाळी अकरा वाजता चारोटी नाका येथील आचार्य भिसे विद्यालय ग्राऊंडवर मुख्यमंत्र्यांची पहिली सभा होणार आहे. तर त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता नालासोपारा पुर्वेला गाला नगर येथे त्यांची दुसरी सभा होणार आहे. या सभांमध्ये ते काय बोलतात याकडे भाजपसोबतच इतर पक्षांच्या नेते मंडळीचे लक्ष आहे.विशेष करून पालघर पोटनिवडणुकी पूर्वी शिवसेनेने आपल्या राजकीय फायद्यासाठी दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांची जी दिशाभूल केली, त्याबाबत मुख्यमंत्री प्रखर भाष्य करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या शिवाय पालघर हा नव्याने अस्तित्वात आलेला जिल्हा असल्याने प्रशासकीय सुधारणांच्या दृष्टीने काही महत्वाच्या घोषणा ते करतील असाही अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभांच्या नियोजनाबाबत विचारले असता महाराष्ट्राचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून हा समाज घटक कायमच विकासाच्या परिघाबाहेरच राहिला आहे. नव्या जिल्हा रचनेनंतर या समाज घटकासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपा कटीबद्ध आहे.फडणवीस भाजपासाठी ठरतात लकीरविवारी मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यात आगमन होत असून पालघरवासीय त्यांचे जोरदार स्वागत करतील यात शंकाच नाही. तसेच मुख्यमंत्री आतापर्यंत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारात सहभागी झालेत, तिथे भाजपने जबरदस्त विजय मिळवले आहेत. आता पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारातही ते सहभागी होत असल्याने इथेही आमचा विजय पक्का असल्याचे मा. चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस