शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 11:44 PM

७०० हेक्टरवर उत्पादन : शहापूर तालुक्यातील आशादायी चित्र

भातसानगर : हिवाळ्यात न साधलेली भाजीपाला पिके उशिरा का होईना मात्र ती सेंद्रिय पद्धतीने घेण्याचा कल शहापूर तालुक्यात वाढत असल्याने भविष्यात सर्वत्र हेच चित्र पाहावयास मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तालुक्यात हिवाळ्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिके घेण्यावर भर असतो. आज तालुक्यात भाजीपाला पिके घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून गावागावांतील शेतकरी शेतीकडे ओढले जात असल्याचे चित्र शहापूर तालुक्यात तरी दिसत आहे. कालवे, नदी, नाले, ओढे यांच्यातील पाण्याचा उपयोग भाजीपाला पिकासाठी केला जात आहे.

जवळजवळ ७०० हेक्टरवर हे उत्पादन घेतले जाते. यामध्ये बहुतांश शेतकरी हे रासायनिक खतांच्या वापराऐवजी आता सेंद्रिय खतांचा वापर करूनच उत्पादन घेण्यावर भर देत आहेत. आज आधुनिक पद्धतीने एसआरटी पद्धतीला जोड ठिबक सिंचनपद्धतीचा अवलंब करून काकडी, भेंडी, कारली, वांगी, मिरची, पपई, झेंडू, टोमॅटो, घोसाळी यासारखी उत्पादने घेतली जात आहेत.रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे उत्पादन वाढले, मात्र त्यामुळे अनेक आजार निर्माण तर झालेच, पण जमिनीचा पोत कमी होऊन ती नापीक बनत असल्याने शेतकरी आता सेंद्रिय पिकाकडे वळला असल्याचे दिसत आहे. या सेंद्रिय पिकांमुळे जमिनीचा पोत वाढतो, जमीन सुपीक बनते, भाजीपाल्याला भावही मिळतो, अधिक उत्पादनही घेता येते.चांगला भाजीपाला विकल्याचे मनाला समाधानही मिळत असल्याचे भास्कर पांडुरंग पाटील, डॉ. प्रकाश काठोले, जगन पाटील या शेतकऱ्यांनी सांगितले.आज तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रियपद्धतीचा अवलंब करून उत्पादन घेत असल्याची आनंदाची बाब समोर येत आहे.- विलास झुंजारराव, कृषी अधिकारीआज आम्ही सेंद्रिय पद्धतीने जो भाजीपाला पिकवतो, त्याचे आम्हाला निश्चित समाधान आहे.- भास्कर पाटील, शेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या