शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

टॅँकरचे १२ प्रस्ताव मंजूर, १७ धूळखात

By admin | Updated: March 10, 2017 03:35 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असल्याने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

- रविंद्र साळवे,  मोखाडादरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असल्याने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे मार्च एप्रिलमध्ये उधभवणाऱ्या भीषण पाणी टंचाईला कसे सामोरे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, त्या संदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टॅँकरच्या १२ प्रस्तावांना मंजूरी मिळाली असून १७ प्रस्ताव अजुनही धुळखात पडून आहेत.मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून तालुक्यातील धामणी कुंडाचापाडा तुंगारवाडी स्वामीनगर दापटी ब्राम्हणगाव हटीपाडा घोसाळी गोळीचा पाडा धामोडी पेंडक्याची ठवळ पाडा टेलीउंबरपाडा असे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे २९ प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने सादर केलेले मोखाडा तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावांना २४ तासात मंजुरी देणे असा शासन नियम असताना एक महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर गोळीचापाडा, धामोडी, दापटी , धामणी, स्वामीनगर, कुंडाचापाडा, ब्राम्हणगाव, तेलीउबरपाडा, ठवळपाडा, चास, हटितीपाडा असे ३ गावे ९ पाड्यांचे प्रस्ताव व यांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८ टॅकर मंजूर करण्यात आले आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला धामोडी गोळीचा पाडा ठवळपाडा अशा तीन गावपाड्यांना २ टँकरने पाणी पुरवठा सुरु असून १ टँकर उभे करून ठेवले आहेत. उर्वरित १७ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर धूळखात पडले आहेत. यामुळे येथील गावपाड्यांना अद्याप तरी त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. दरवर्षीच येथील भूमीपुत्रान वर पाणी टंचाईचे संकट येत असल्याने घोटभर पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागते. टँकरच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्च करणारे प्रशासन या ठिकाणी मुबलक पाणीसाठा असूनही निजोजन करण्याचा प्रयत्न करत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांचे सदोष धोरण अन् टंचाईचा कळस- झोपी गेलेले प्रशासन अजूनही पाणी टंचाई कडे गांभीर्य ने बघत नाही येथील रोजगाराचा प्रश्न किंवा कुपोषण पाणीटंचाई समस्या असो माध्यमांची भूमिका निर्णायक राहिली आहे. गेल्या काही महिन्यापासून मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधव पाणी टंचाईच्या समस्येने बेजार झाला आहे.याबाबत लोकमतने सडेतोड लिखाण करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. त्याच बरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा टँकरच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिल्याने तात्काळ ९ प्रस्ताव व ६ टँकर मंजूर केल्या आहेत परंतु असे असले तरी घोटभर पाण्यासाठी कोसोमैल भटकंती करावी लागत आहे.२४ तासात टँकरने पाणी पुरवठा करण्याचे धोरण असताना जिल्हाधिकारी या धोरणाची अम्मल बजावणी करीत नाहीत. त्यामुळे एक महिन्याचा कालावधी नंतरही १७ प्रस्ताव पडून आहेत. १२ प्रस्तावना मंजुरी दिली असली तरी ३ गावानाच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.