शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

टॅँकरचे १२ प्रस्ताव मंजूर, १७ धूळखात

By admin | Updated: March 10, 2017 03:35 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असल्याने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

- रविंद्र साळवे,  मोखाडादरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असल्याने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे मार्च एप्रिलमध्ये उधभवणाऱ्या भीषण पाणी टंचाईला कसे सामोरे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, त्या संदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टॅँकरच्या १२ प्रस्तावांना मंजूरी मिळाली असून १७ प्रस्ताव अजुनही धुळखात पडून आहेत.मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून तालुक्यातील धामणी कुंडाचापाडा तुंगारवाडी स्वामीनगर दापटी ब्राम्हणगाव हटीपाडा घोसाळी गोळीचा पाडा धामोडी पेंडक्याची ठवळ पाडा टेलीउंबरपाडा असे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे २९ प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने सादर केलेले मोखाडा तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावांना २४ तासात मंजुरी देणे असा शासन नियम असताना एक महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर गोळीचापाडा, धामोडी, दापटी , धामणी, स्वामीनगर, कुंडाचापाडा, ब्राम्हणगाव, तेलीउबरपाडा, ठवळपाडा, चास, हटितीपाडा असे ३ गावे ९ पाड्यांचे प्रस्ताव व यांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८ टॅकर मंजूर करण्यात आले आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला धामोडी गोळीचा पाडा ठवळपाडा अशा तीन गावपाड्यांना २ टँकरने पाणी पुरवठा सुरु असून १ टँकर उभे करून ठेवले आहेत. उर्वरित १७ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर धूळखात पडले आहेत. यामुळे येथील गावपाड्यांना अद्याप तरी त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. दरवर्षीच येथील भूमीपुत्रान वर पाणी टंचाईचे संकट येत असल्याने घोटभर पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागते. टँकरच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्च करणारे प्रशासन या ठिकाणी मुबलक पाणीसाठा असूनही निजोजन करण्याचा प्रयत्न करत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांचे सदोष धोरण अन् टंचाईचा कळस- झोपी गेलेले प्रशासन अजूनही पाणी टंचाई कडे गांभीर्य ने बघत नाही येथील रोजगाराचा प्रश्न किंवा कुपोषण पाणीटंचाई समस्या असो माध्यमांची भूमिका निर्णायक राहिली आहे. गेल्या काही महिन्यापासून मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधव पाणी टंचाईच्या समस्येने बेजार झाला आहे.याबाबत लोकमतने सडेतोड लिखाण करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. त्याच बरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा टँकरच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिल्याने तात्काळ ९ प्रस्ताव व ६ टँकर मंजूर केल्या आहेत परंतु असे असले तरी घोटभर पाण्यासाठी कोसोमैल भटकंती करावी लागत आहे.२४ तासात टँकरने पाणी पुरवठा करण्याचे धोरण असताना जिल्हाधिकारी या धोरणाची अम्मल बजावणी करीत नाहीत. त्यामुळे एक महिन्याचा कालावधी नंतरही १७ प्रस्ताव पडून आहेत. १२ प्रस्तावना मंजुरी दिली असली तरी ३ गावानाच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.