शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

नुकसान भरपाईसाठी पीडित नारंगी ग्रामस्थ तासंतास रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 3:46 AM

रांगेत उभे दिले टोकन नंबर देऊन केले धनादेशाचे वाटप

वसई : जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे पिडलेल्या वसई पूर्वेतील नारिंगी वासियांना शासकीय अधिकाऱ्यांच्या संवेदनाशुन्य कारभारामुळे तासंतास रांगेत उभे राहण्याचा प्रकार बुधवारी (५ जुलै) घडला आहे. वास्तविक शासकीय आदेशानुसार सरकारी अधिकाºयांनी पीडितांच्या घरोघरी जाऊन त्यांना मदतीचा धनादेश देणे अपेक्षित होते.वसई पूर्वेतील नारंगी गावच्या शेकडो ग्रामस्थांना ग्रामस्थांचे वसई महसूलच्या पथकाने दोन महिन्यापूर्वी पंचनामे पूर्ण केले. मात्र, इतका मोठा आर्थिक फटका बसून देखील दोन महिने उलटले तरीही शासन आदेश झुगारून मदतीच्या नावाने गोरगरिबांना आदल्या दिवशी टोकन नंबर देत त्यांना तासंनतास रांगेत उभे करीत पीडितांना मदतीच्या धनादेशाचे वाटप केल्याचा गंभीर प्रकार नारंगी विभागातील तलाठ्याने विरार कार्यालयात केला आहे. शासन आदेशानुसार वसईतील पीडित पूरग्रस्त नागरिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर त्या- त्या विभागवार तलाठी व मंडळ अधिकाºयांनी थेट या पीडित पूरग्रस्तांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदतीचे धनादेश वाटप करण्याचे शासन आदेश आहेत ,मात्र नारंगी विभागातील तलाठी गायकर यांनी विरार तलाठी कार्यालयाबाहेर ५ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांना धनादेश घेण्यासाठी आदल्या दिवशी गावात टोकन नंबरचे वाटप केले होते. दरम्यान येथे केवळ यादीतील ८० ते ८५ टक्के पीडितांनाच हे धनादेश मिळाले, तर उरलेल्यांना माघारी फिरावे लागले.अजूनही काहींना मदतीचे धनादेश नाहीत?वसईच्या अजूनही काही विभागात मदतीचे धनादेश देणे शिल्लक असताना असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी वसई प्रांत व तहसीलदार यांनी या घडल्या प्रकारची विशेष नोंद घेणे आवश्यक असून पुन्हा एकदा आपले सरकार म्हणून गतिमान महसूल प्रशासन हे कसे आहे हेच या महसूलच्या गलथान प्रकारावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.वसई महसूल पथकाने तालुक्यात जवळपास साडेअकरा हजारहुन अधिक पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ९५ टक्क्याहून अधिक मदतीचे धनादेश वाटप केले असून अजूनही साधारण सहाशे ते साडेसहाशे धनादेशाचे वाटप होणे शिल्लक आहे. - किरण सुरवसे, तहसीलदार

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस