शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

वसईकर करणार रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 22:38 IST

निवेदने देऊनही प्रतिसाद नाही, ग्रामस्थ अस्वस्थ

वसई : वसईतील चुळणे गावानजीक शहर वसाहतीच्या भागात प्रचंड प्रमाणात मातीभराव सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. मातीभराव थांबवा, अन्यथा पुढील आठवड्यात माणिकपूर नाका किंवा भाबोला नाका येथील रस्ता बंद पाडण्याचा इशारा वसईकरांनी दिला आहे.दोनच दिवसांपूर्वी चुळणे ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने या बेसुमार मातीभराव व सपाटीकरणाबाबत महसूल विभागाकडे तक्रार करीत प्रांत व तहसीलदार यांना निवेदन सादर केले होते. शिष्टमंडळाने चुळणे शहरी भागात सुरू असलेला मातीभराव तत्काळ थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वसईचे प्रांत व तहसीलदार यांची भेट घेतली होती. गावकऱ्यांनी गोम्स यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाची भेट घेऊन चार दिवस उलटले, तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेले जागृती संघटनेचे मार्गदर्शक तथा तत्कालीन चुळणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जॅक गोम्स यांनी ग्रामस्थांच्या बैठकीत येत्या दोन दिवसात रास्ता रोको आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली आहे.गोम्स यांच्या सांगितले की, कधी काळी अतिशय निसर्गरम्य व हिरवाईने नटलेला चुळणे गाव अशी ओळख असलेल्या गावाला आता सिमेंटच्या जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावाच्या चारही बाजूनी मोठमोठे बांधकाम प्रकल्प उभे राहिल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गावात पाणी तुंबून राहते. तांत्रिक दोष असा की, मोठमोठ्या इमारती बांधताना विकासकांनी येथील पावसाळी पाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाले बुजवल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.गेल्या पावसाळ्यात सलग चार दिवस चुळणे गाव पाण्याखाली होते. गावाचा बाह्य जगाशी संबंध तुटल्यासारखी स्थिती होती तर अनेक ठिकाणी वीज मीटरच्या बॉक्समध्ये पाणी शिरल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. घराघरात पाणी तुंबल्याने ग्रामस्थांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले. सध्या याच गावाच्या परिसरात सुरू असलेल्या माती भरावामुळे येत्या पावसाळ्यात भीषण स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.आज चुळणेकर जात्यात आहेत, तर उत्तर वसईचा बराच भाग सुपात आहे. सर्व ग्रामस्थांनी मिळून विकासकांना रोखले नाही तर आज जे चित्र दिसते ती स्थिती संपूर्ण उत्तर वसईची दिसू शकेल.जॅक गोम्स, माजी सरपंच, चुळणे, वसई