शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या पाली गावात महापालिकेच्या नळातून गटाराचे पाणी; गटाराच्या घाण पाण्याने नागरिक त्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:35 IST

गेल्या काही दिवस पासून भाईंदरच्या पाली गाव आणि शांती नगर भागातील अनेक मच्छीमारांच्या घरातील महापालिका नळातून पिण्याच्या शुद्ध पाण्या ऐवजी गटाराचे काळेकुट्ट दूषित पाणी येत आहे.

मीरारोड- भाईंदरच्या पाली गाव भागात मीरा भाईंदर महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या नळां मधून चक्क गटाराचे काळेकुट्ट दुर्गंधीचे पाणी येत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेने दिखाऊगिरी साठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्या पेक्षा नागरिकांना आधी चांगले शुद्ध पाणी द्यावे. आम्ही काय गटाराचे पाणी प्यायचे का ? असा संतप्त सवाल मच्छीमारांनी केला आहे. 

गेल्या काही दिवस पासून भाईंदरच्या पाली गाव आणि शांती नगर भागातील अनेक मच्छीमारांच्या घरातील महापालिका नळातून पिण्याच्या शुद्ध पाण्या ऐवजी गटाराचे काळेकुट्ट दूषित पाणी येत आहे. त्यामुळे येथील लोकं त्रासले आहेत. पाणी इतके घाण व काळे असून ते काहीच उपयोगाचे नाही. लोकांना पिण्याच्या पाण्यासह आंघोळीला, जेवण बनवायला, कपडे - भांडी धुण्यासाठी देखील पाणी विकत घ्यावे लागत आहे. 

ह्या भागातील जलवाहिन्या जुन्या झाल्या असून शिवाय समुद्र किनारी असल्याने लवकर खराब होतात. त्यातच महापालिकेने आधी येथे मुख्य रस्त्यावर मोठी जलवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले. त्या नंतर अन्य कामांसाठी रस्ता खोदकाम सुरूच आहे. महापालिका येथील मच्छीमारांच्या मूलभूत समस्या सोडवण्या कडे नेहमीच उदासीनता दाखवते. येथील डम्पिंग पासून अनेक गंभीर समस्यांनी लोकांचे जगणे मुश्किल झाल्याने पालिके विरुद्ध आधीच संताप आहे. त्यातच पालिकेच्या नळाला गटाराचे पाणी येत असल्याने नाराजी वाढली आहे. 

पिंकी मिरांडा ( स्थानिक मच्छीमार) - पाली - शांती नगर भागात दुर्गंधीयुक्त ह्या दूषित पाण्याचा पुरवठा नळातून होत आहे. हे पाणी पिण्यासाठी तर सोडाच पण घरात लादी पुसायला देखील वापरण्या सारखे नाही. पालिकेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी कधीतरी आमच्या कोळीवाड्यात येउन येथील मच्छीमारांना कसे त्रासदायक जीवन जगावे लागत आहे याचा आढावा घ्यावा. 

बर्नड डिमेलो (  मच्छीमार नेते ) - नागरिकांच्या आरोग्याशी व सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तक्रारी केल्या तरी दुर्लक्ष केले जाते. समस्या सोडवण्या ऐवजी पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी बेफिकीर व उद्धटपणे लोकांशी वागतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Gutter Water Flows From Municipal Taps in Bhayandar's Pali Village

Web Summary : Residents of Bhayandar's Pali village are distressed as sewage-contaminated water flows from municipal taps. Locals are forced to purchase water for daily needs due to the polluted supply. Old pipelines and continuous road excavation exacerbate the problem, with residents alleging municipal apathy towards basic amenities and slow response to complaints.
टॅग्स :WaterपाणीMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक