शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मोखाड्यात टंचाईच्या झळा; हंडाभर पाण्यासाठी मायलेकींची मैलोन्मैल पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:10 PM

तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही.

- रविंद्र साळवे मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही. नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या २४ नळ पाणी पुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना आदींमुळे टँकर मुक्त गावाची संख्या वर्ष निहाय वाढत चालली आहे. लांबच लांब पायपिट करुन हंडाभर पाणी मिळत असल्याने हाताला काम नको, खायला अन्न नको पण प्यायला पाणी द्या अशी आर्त हाक येथील आदिवासी गावकऱ्यांनी दिली आहे.तालुक्यात जवळपास ५ मोठी धरणे असुन तेथून १२० किलो मीटर अंतरावर असणाऱ्या मुबंई शहराला पाणी पुरवठा होत आहे. मात्र, स्थानिक गाव पाडे पाण्याविना तहानलेलिच आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील ४६ गाव पाड्यात पाणी बाणीचे संकट निर्माण झाले असून दिवसाआड टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना १५ टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या गावातून टॅँकर मागणीचे प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे येऊन धडकत असल्याने प्रशासनाची देखील धावपळ उडत आहे.उन्हाळ्याच्या सुरवातीला दरवर्षी उद्भवणाºया परिस्थिती वर कायम स्वरु पी तोडगा काढण्याचे शहाणपण मात्र कोणालाच सुचत नसल्याने गाव पाडे वासियांकडुन रोष व्यक्त केला जात आहे. गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाºय विहिरींपासुन टंचाई ग्रस्त गाव पाडे २०-२५ किलो मीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे.महत्त्वाची बाब म्हणजे टंचाई ग्रस्त नागरिकांना हातातली कामे सोडुन देऊन घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे तर टँकर चालु असलेल्या गाव पाड्यांतील जनतेला चातक पक्षा प्रमाणे टँकर ची दिवसभर वाट बघावी लागत असुन मोलमजुरी करु न पोटाची खळगी भरणार्या आदिवासी बांधवाची मोठी अडचण झाली आहे.दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने संताप : राज्य शासनाने जव्हार मोखाडा हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. टंचाईग्रस्त गावपाड्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु असे असताना देखील तालुक्यातील कीनिस्ते, शेलमपाडा, धामोडी, पाथर्डी, डोंगर वाडी, वशिंद या गावपाड्यांना दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने येथील आदिवासीची पाण्यासाठी होणारी पायपीट आणखी वाढली आहेपुढाऱ्यांवर रोषआगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून विजयाची गणिते जुळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून कंबर कसली जाणार आहे. परंतु गेल्या अनेक निवडणुकांच्या आश्वासनात येथील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. भूमिपुत्रांचेच्या हक्काचे पाणी मुबंईला पुरवले जाते परंतु स्थानिक पाणी टंचाई भोगत आहेत.धरना लगत असलेल्या गावांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना नकरता टँकर लॉबीच्या घशात कोट्यवधी रु पये घालण्याचा वाझोटा प्रयत्न दरवर्षीच प्रशासनाकडून केला जात आहे. यामुळे पाण्याच्या प्रश्नावरु न पुढाºयांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई