शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

सेवानिवृत्त शिक्षकांचा निवडणुकीवर बहिष्कार, मतदान करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 06:12 IST

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले पत्र : सेवासुविधांसाठी करावी लागतेय वणवण, दुर्लक्षित धोरण

पालघर : जिल्ह्यात निवडश्रेणीसाठी निरनिराळ्या अटी व शर्ती घालून निवडश्रेणी लाभा पासून वंचित ठेवले जात असताना दुसरी कडे राज्यातील अन्य जिल्ह्यात मात्र त्याचा लाभ दिला जात आहे. भर उन्हात वार्धक्याच्या काळात अनेक कार्यालयाच्या हेल पाट्या माराव्या लागत असल्याने जिल्ह्यातील एक हजार पन्नास सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेतल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ पारित केले असून हा अधिनियम महाराष्ट्रात सर्वत्र लागू करण्यात आल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात हे सरकार मात्र जिल्ह्यातील एक हजार सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकावर अन्याय करीत असल्याचे दिसून आले आहे. १ जानेवारी १९८६ रोजी किमान १८ वर्षे सेवा झालेल्या प्राथमिक शिक्षकांना २४ वर्षाच्या अहर्तताकारी सेवेनंतर निवड श्रेणी लागू करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले आहे . या शासन निर्णयास दहा वर्षे पूर्ण होत याबाबत राज्य विधिमंडळात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून चर्चा ही घडून आलेली आहे.

जिल्हा विभाजनापूर्वी ठाणे जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन व पेन्शनर्स यांच्यावतीने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांना लेखी व तोंडी निवेदन देण्यात आली असतानाही या शासन निर्णयाची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. मे २०१४ च्या आदेशानुसार ५६९ प्राथमिक शिक्षकांना शासन निर्णयातील अटी व शर्तींचा अभ्यास न करता केवळ राजकीय दबावापोटी चुकीचे व अन्यायकारक आदेश निर्गिमत करण्यात आल्याचे शिक्षण संस्थांचे म्हणणे आहे. या आदेशास डहाणू तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघाने आक्षेप घेऊन चुकीचे आदेश रद्द करणे बाबत हरकत घेतली आहे. तेव्हापासून आजतागायत पालघर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेच्यावतीने पालघर जिल्हा परिषदेशी सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यातील कर्मचाºयांना हा लाभ मिळत असून पालघर जिल्ह्यातील १ हजार १५ कर्मचारी यापासून वंचित राहत असल्याचे त्यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आले आहे.त्यापैकी सर्व शिक्षकांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली असून न्यायाच्या प्रतीक्षेत कार्यालयात हेलपाटे मारणारे अनेक शिक्षकांना मृत्यूने कवटाळले आहे. तर लढा देणाºया अनेकांना शारीरिक व्याधीने ग्रासले असून औषधोपचार व आर्थिक कुचंबनेमुळे आपल्याला मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे व्यथा कार्याध्यक्ष द का संखे यांनी लोकमत पुढे व्यक्त केली.

शासन ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध योजनांद्वारे त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी किटबद्ध असल्याचे सांगत असताना इथे मात्र आमच्या वर अन्याय केला जात असल्याचे उपाध्यक्ष देऊ शेलार ह्यांनी सांगितले. वयाच्या ७५ व्या वर्षाच्या ह्या वयात आम्हाला उन्हा-तान्हात फिरायला लावून आमच्यावर अन्याय केला जात असल्याने आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूक