शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

वसईच्या किल्ल्याची डागडुजी रखडली; अवैध बांधकामे आणि अविचारी कृत्यामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 03:39 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष, या किल्ल्यावर  गॅप ॲनालिसीस स्किमअंतर्गत पिण्याचे पाणी, शौचालये बांधण्याचे काम पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे.

प्रतीक ठाकूर 

विरार : वसईतील पोर्तुगीजांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्यासाठी नरवीर चिमा­जी आप्पांनी वसईवर आक्रमण केले. वसईचा रणसंग्राम व मिळवलेला विजय हा हजारो मराठ्यांच्या रक्ताने लिहिला गेला आहे. त्यामुळे इतिहासात त्याला मानाचे स्थान आहे. तीन दशकांचा हा इतिहास आहे. वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणून नरवीर रणवीर चिमाजीअप्पा यांच्या वसई किल्ल्याची ओळख आहे. परंतु या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली आहे.

या किल्ल्यावर  गॅप ॲनालिसीस स्किमअंतर्गत पिण्याचे पाणी, शौचालये बांधण्याचे काम पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे. या किल्ल्यातील चर्च आणि जमिनीच्या आत दडलेले अवशेष शोधण्यासाठी रिवाइज कॉन्झरवेशन प्रोग्राम अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यक आहे. यासाठी वसई पुरातत्त्व विभागाकडून केंद्र सरकारकड़े अप्रूवल पाठवण्यात आले असून या निधीच्या प्रतीक्षेत पुरातत्त्व विभाग आहे. यातील एका चर्चच्या डागडुजीसाठी अंदाजे दोन कोटी निधी गृहीत धरला तरी यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता लागू शकते, असे पुरातत्त्व खात्याचा अंदाज आहे. 

ऐतिहासिक महत्त्व१०९ एकरच्या परिसरांत पसरलेला हा किल्ला आहे. या किल्ल्यावर एकूण ७ चर्च आहेत. यातील ५ चर्चच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागाकडून करण्यात येत आहे. देशभरातील १०० आदर्श स्मारकांमध्ये वसई किल्ल्याचा समावेश पुरातत्त्व खात्याकडून करण्यात आला आहे. या किल्ल्यावरील महत्त्वपूर्ण ठेवा जपण्याचे काम रिवाइज कॉन्झर्वेशन प्रोग्रामअंतर्गत करण्यात येत आहे.

पुरातत्त्व विभागाने कंबर कसली 

येथे होणाऱ्या बेकायदा बांधकामांनी किल्ल्याला  धोका  निर्माण होत आहे. दोनेक वर्षांपूर्वी किल्ल्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी दुर्गप्रेमीच्या तक्रारीची दखल घेऊन केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाने कंबर कसली होती. त्यानुसार अनिधकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. 

वसई किल्ल्याला दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी हौशी पर्यटक, ट्रेकर्स, इतिहासकार, जाणकार व किल्लेप्रेमी भेटी देत असतात. एका बाजूला असलेली वसई-नायगावची खाडी तर दुसऱ्या बाजूला कोळी बांधवांची गावे आहेत. 

नरवीर चिमाजी अप्पांचा किल्ला हा वसईचा इतिहास आहे  त्याच्या नूतनीकरणासाठी अनेक वेळा आम्ही मागणी केली आहे, पण ठोस काही झाले नाही. यामुळे किल्ल्याची अजून दुर्दशा होत आहे. - महेश राऊत, गडप्रेमी 

 

टॅग्स :Fortगड