शहरं
Join us  
Trending Stories
1
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत परसेल अंधकारा, कोण कोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
4
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
5
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
6
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
7
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
8
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
9
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
10
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
11
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
12
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
13
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
14
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
15
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
16
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
17
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
18
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
20
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
Daily Top 2Weekly Top 5

वसईच्या किल्ल्याची डागडुजी रखडली; अवैध बांधकामे आणि अविचारी कृत्यामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 03:39 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष, या किल्ल्यावर  गॅप ॲनालिसीस स्किमअंतर्गत पिण्याचे पाणी, शौचालये बांधण्याचे काम पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे.

प्रतीक ठाकूर 

विरार : वसईतील पोर्तुगीजांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्यासाठी नरवीर चिमा­जी आप्पांनी वसईवर आक्रमण केले. वसईचा रणसंग्राम व मिळवलेला विजय हा हजारो मराठ्यांच्या रक्ताने लिहिला गेला आहे. त्यामुळे इतिहासात त्याला मानाचे स्थान आहे. तीन दशकांचा हा इतिहास आहे. वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणून नरवीर रणवीर चिमाजीअप्पा यांच्या वसई किल्ल्याची ओळख आहे. परंतु या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली आहे.

या किल्ल्यावर  गॅप ॲनालिसीस स्किमअंतर्गत पिण्याचे पाणी, शौचालये बांधण्याचे काम पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे. या किल्ल्यातील चर्च आणि जमिनीच्या आत दडलेले अवशेष शोधण्यासाठी रिवाइज कॉन्झरवेशन प्रोग्राम अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यक आहे. यासाठी वसई पुरातत्त्व विभागाकडून केंद्र सरकारकड़े अप्रूवल पाठवण्यात आले असून या निधीच्या प्रतीक्षेत पुरातत्त्व विभाग आहे. यातील एका चर्चच्या डागडुजीसाठी अंदाजे दोन कोटी निधी गृहीत धरला तरी यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता लागू शकते, असे पुरातत्त्व खात्याचा अंदाज आहे. 

ऐतिहासिक महत्त्व१०९ एकरच्या परिसरांत पसरलेला हा किल्ला आहे. या किल्ल्यावर एकूण ७ चर्च आहेत. यातील ५ चर्चच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागाकडून करण्यात येत आहे. देशभरातील १०० आदर्श स्मारकांमध्ये वसई किल्ल्याचा समावेश पुरातत्त्व खात्याकडून करण्यात आला आहे. या किल्ल्यावरील महत्त्वपूर्ण ठेवा जपण्याचे काम रिवाइज कॉन्झर्वेशन प्रोग्रामअंतर्गत करण्यात येत आहे.

पुरातत्त्व विभागाने कंबर कसली 

येथे होणाऱ्या बेकायदा बांधकामांनी किल्ल्याला  धोका  निर्माण होत आहे. दोनेक वर्षांपूर्वी किल्ल्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी दुर्गप्रेमीच्या तक्रारीची दखल घेऊन केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाने कंबर कसली होती. त्यानुसार अनिधकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. 

वसई किल्ल्याला दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी हौशी पर्यटक, ट्रेकर्स, इतिहासकार, जाणकार व किल्लेप्रेमी भेटी देत असतात. एका बाजूला असलेली वसई-नायगावची खाडी तर दुसऱ्या बाजूला कोळी बांधवांची गावे आहेत. 

नरवीर चिमाजी अप्पांचा किल्ला हा वसईचा इतिहास आहे  त्याच्या नूतनीकरणासाठी अनेक वेळा आम्ही मागणी केली आहे, पण ठोस काही झाले नाही. यामुळे किल्ल्याची अजून दुर्दशा होत आहे. - महेश राऊत, गडप्रेमी 

 

टॅग्स :Fortगड