शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

वसईच्या किल्ल्याची डागडुजी रखडली; अवैध बांधकामे आणि अविचारी कृत्यामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 03:39 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष, या किल्ल्यावर  गॅप ॲनालिसीस स्किमअंतर्गत पिण्याचे पाणी, शौचालये बांधण्याचे काम पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे.

प्रतीक ठाकूर 

विरार : वसईतील पोर्तुगीजांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्यासाठी नरवीर चिमा­जी आप्पांनी वसईवर आक्रमण केले. वसईचा रणसंग्राम व मिळवलेला विजय हा हजारो मराठ्यांच्या रक्ताने लिहिला गेला आहे. त्यामुळे इतिहासात त्याला मानाचे स्थान आहे. तीन दशकांचा हा इतिहास आहे. वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणून नरवीर रणवीर चिमाजीअप्पा यांच्या वसई किल्ल्याची ओळख आहे. परंतु या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली आहे.

या किल्ल्यावर  गॅप ॲनालिसीस स्किमअंतर्गत पिण्याचे पाणी, शौचालये बांधण्याचे काम पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे. या किल्ल्यातील चर्च आणि जमिनीच्या आत दडलेले अवशेष शोधण्यासाठी रिवाइज कॉन्झरवेशन प्रोग्राम अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यक आहे. यासाठी वसई पुरातत्त्व विभागाकडून केंद्र सरकारकड़े अप्रूवल पाठवण्यात आले असून या निधीच्या प्रतीक्षेत पुरातत्त्व विभाग आहे. यातील एका चर्चच्या डागडुजीसाठी अंदाजे दोन कोटी निधी गृहीत धरला तरी यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता लागू शकते, असे पुरातत्त्व खात्याचा अंदाज आहे. 

ऐतिहासिक महत्त्व१०९ एकरच्या परिसरांत पसरलेला हा किल्ला आहे. या किल्ल्यावर एकूण ७ चर्च आहेत. यातील ५ चर्चच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागाकडून करण्यात येत आहे. देशभरातील १०० आदर्श स्मारकांमध्ये वसई किल्ल्याचा समावेश पुरातत्त्व खात्याकडून करण्यात आला आहे. या किल्ल्यावरील महत्त्वपूर्ण ठेवा जपण्याचे काम रिवाइज कॉन्झर्वेशन प्रोग्रामअंतर्गत करण्यात येत आहे.

पुरातत्त्व विभागाने कंबर कसली 

येथे होणाऱ्या बेकायदा बांधकामांनी किल्ल्याला  धोका  निर्माण होत आहे. दोनेक वर्षांपूर्वी किल्ल्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी दुर्गप्रेमीच्या तक्रारीची दखल घेऊन केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाने कंबर कसली होती. त्यानुसार अनिधकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. 

वसई किल्ल्याला दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी हौशी पर्यटक, ट्रेकर्स, इतिहासकार, जाणकार व किल्लेप्रेमी भेटी देत असतात. एका बाजूला असलेली वसई-नायगावची खाडी तर दुसऱ्या बाजूला कोळी बांधवांची गावे आहेत. 

नरवीर चिमाजी अप्पांचा किल्ला हा वसईचा इतिहास आहे  त्याच्या नूतनीकरणासाठी अनेक वेळा आम्ही मागणी केली आहे, पण ठोस काही झाले नाही. यामुळे किल्ल्याची अजून दुर्दशा होत आहे. - महेश राऊत, गडप्रेमी 

 

टॅग्स :Fortगड