शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पाचूबंदर स्मशानभूमीला रात्री टाळे

By admin | Published: March 16, 2017 2:42 AM

पाचूबंदर येथील महापालिकेच्या स्मशानभूमीला रात्री आठ वाजताच टाळे लावले जात असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे

शशी करपे, वसईपाचूबंदर येथील महापालिकेच्या स्मशानभूमीला रात्री आठ वाजताच टाळे लावले जात असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. सदर स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीचे काम महिला बचत गटाकडे सोपवण्यात आल्यापासून आठ वाजता स्मशानभूमी बंद केली जात असल्याने अंत्यसंस्कार करण्याऱ्यांना रात्री गेटबाहेर थांबावे लागत आहे.वसई विरार महापालिकेच्या सर. डी. एम. पेटीट हॉस्पीटलमध्ये गेल्या आठवड्यात चंद्रीका शर्मा ही महिला प्रसुत झाली. मात्र, प्रसुतीनंतर लगेचच बाळाचा मृत्यु झाला. यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते. हॉस्पीटलमध्ये जबाबदार डॉक्टर नव्हते. त्याठिकाणी असलेल्या नर्सने मृत बाळ वडिलांच्या ताब्यात दिले. मृत बाळ नवजात असल्याने वडिल आपल्या नातेवाईकांसह रात्री बाराच्या सुमारास पाचूबंदर स्मशानभूमीत गेले. मात्र, स्मशानभूमीचे गेट बंद होते आणि त्याला टाळे लावण्यात आले होते. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हातात घेऊन त्या लोकांना तब्बल तीन तास गेटबाहेर ताटकळत बसून रहावे लागले. गेल्या चार महिन्यातील ही तिसरी घटना. रात्री आठनंतर अंत्यसंस्काराला गेलेल्या दोन मृतदेहांना अशीच वाट पहावी लागली होती. दोन महिन्यांपूर्वी तर संतप्त लोकांनी स्मशानभूमीचे टाळे तोडून अंत्यसंस्कार उरकले होते. याची तक्रार आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे दोन वेळा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी आश्वासन देऊनही कोणतीच कारवाई झाली नाही, अशी माहिती भाजपाचे वसई शहर युवकचे उपाध्यक्ष सुशील ओगले यांनी दिली. तत्कालीन वसई नगरपरिषेदपासून पंधरा वर्षे याठिकाणी ठेका पद्धतीवर एक सुरक्षा रक्षक नेमण्यात आला होता. त्याला जवळच एक खोलीही बांधून देण्यात आली होती. सुरक्षा रक्षक चोवीस तास असल्याने रात्री अपरात्री स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येत होते. पण, आता सुरक्षा रक्षक काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी स्मशानभूमीची देखभाल दुरुस्तीचे काम एका महिला बचत गटाला देण्यात आले आहे. त्यामुळे रात्री आठ वाजतानंतर सुरक्षा रक्षक नसल्याने स्मशानभूमीच्या गेटला टाळे लावले जाते. त्यामुळे पाचूबंदर परिसरातील गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतो. हा प्रकार अतिशय गंभीर असून त्याची सखोल चौकशी केली जाईल, असे उपमहापौर उमेश नाईक यांनी दिले. तसेच याप्रकरणी लक्ष घालून असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेण्यात यावी असे प्रभाग समिती आयचे सभापती प्रवीण शेट्टी सूचना दिल्या.