शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

डहाणू तालुक्यात पावसाअभावी भातरोपण्या रखडल्या; हळवी भातशेती करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:37 AM

पावसाने पाठ फिरवल्यामुळे रोपणीसाठी पाणी मिळेना

कासा : डहाणू तालुक्यात पावसाअभावी भात रोपण्या रखडल्या आहेत. रोपणीसाठी पाणीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती ओस टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जात असून यामध्ये गरवी, निमगरवी, हळवी भात पीक घेतली जातात. तालुक्यातील कासा, सायवन, वाणगाव, धुंदलवाडी आधी भागात पावसाअभावी शेतकºयांना आपल्या रोपण्या थांबवाव्या लागल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दांडी मारली आहे.

शेतकºयांनी सुरुवातीला हळव्या भातशेतीच्या रोपणीची कामे सुरू केली. मात्र, काही दिवसांनी पावसाने दांडी मारल्याने चिखलणीसाठी पाणी कमी पडू लागले. त्यामुळे शेतकºयांनी हळवी भातपीक सोडून गरवी भात लागवड सुरू केली. मात्र सतत आठवडाभर पाऊस गायब झाल्याने गरवी भात लागवडीसाठीही पाणी कमी पडू लागले. त्यामुळे काही शेतकºयांनी मोटारपंप व विहिरींवर इंजिन लावून लागवड सुरू केली, तर खेड्यापाड्यातील शेतकरी इकडून तिकडून किंवा कोणाकडून मागून इंजिन, पाईप, मोटारच्या साह्याने जिथे विहीर, नाला, एखाद्या खड्ड्यातून पाणी घेणे शक्य आहे, तिथून पाणी घेऊन रोपण्या थोड्या प्रमाणात चालू ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर जिकडे चिखलनीसाठी पाणी नेणे शक्य नाही ती शेती ओस टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी भात लागवड केली आहे, तिथे पाऊस पडत असल्याने ती शेती कोरडी पडत असून शेतात भेगा पडत आहेत. त्यामुळे खूप पाण्यासाठी खटाटोप करून लागवड केलेली पिकेही आता पावसाअभावी करपू लागली आहेत.पाऊस पडत नसल्याने आमची रोपणीची कामे थांबली आहेत. येत्या आठवडाभरात पाऊस पडला नाही, तर शेती ओस टाकावी लागेल.- सुनील घरत, शेतकरी, कासा

टॅग्स :Farmerशेतकरी