शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

भातसा धरणग्रस्तांना अखेर ५० वषार्नंतर मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 11:49 PM

पुनर्वसनाचा मार्ग मोकळा । मुंबई महापालिकेत नोकरीचे आश्वासन

वसंत पानसरेकिन्हवली : ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्याला धरणांचा तालुका असेही संबोधले जाते. येथील नागरिकांनी धरणासाठी त्यांच्या परंपरागत जमिनी दिल्या. मात्र त्या बदल्यात वर्षोनुवर्षे त्यांचे पुनर्वसन झाले नाही,कुठल्याही सुविधा, नोकºया नाहीत ही वस्तूस्थिती असल्याचा गंभीर आरोप आजही प्रकल्पग्रस्त करीत आहेत. १९६७ मध्ये १२७ वास्तव्यास असलेली कुटुंब व सगळे गाव भातसा धरणाच्या जलाशयात बुडाली. गावांचे आणि कुटुंबांचे कित्येक वर्षांनंतरही पुनर्वसन न झाल्याने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबांना सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे ,भाऊ महालुंगे व समिती यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर ५० वषार्नंतर न्याय मिळाला आहे. भातसा प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन होणार असून महापालिकेत नोकरीही मिळणार आहे.

१९६७ मध्ये झालेल्या भातसा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील पाल्हेरी, पाचीवरे, वाकीचा पाडा आणि घोडेपाऊल या गावाच्या जमिनी धरणाच्या बुडीताखाली गेल्या. तर या पाच गावपाड्यांवरील १२७ कुटुंब १९७०-७२ च्या दरम्यान भातसा धरणाच्या जलाशयात बुडाली.सरकारने भातसा प्रकल्पासाठी तीन हजार २७८ हेक्टर जमीन संपादीत केली. यातील ६५३ हेक्टर खाजगी होती आणि बाकी सरकारच्या मालकीची वन जमीन होती. ज्या १२७ कुटुंबांच्या जमिनी गेल्या त्यामध्ये ९७ ठाकूर आदिवासी होते तर ३० ओबीसी. हे सगळे प्रकल्पग्रस्त ५० वर्षे झाली तरी पुनर्वसनाची वाट पाहत होते. १९७०-७१ मध्ये लागवडीखालील जमिनी एकरी २३० रूपये अशा कवडीमोल भावात संपादीत केल्या होत्या. अखेर १९७३ पासून, विस्थापित झालेल्या या ग्रामस्थांनी निदर्शने, उपोषण, धरणे, बैठका आणि सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा आणि पत्रव्यवहार अशा न्यायासाठीचा प्रवास सुरू झाला. मात्र न्याय मिळाला नाही. अखेर १९८६ मध्ये स्थापन झालेल्या भातसा धरण पुनर्वसन समितीच्या माध्यमातून विस्थापितांचा संघर्ष सुरू झाला होता.

त्यापूर्वी समितीने शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तर १० मार्च २०१५ मध्ये आझाद मैदानात प्रकल्पग्रस्तांनी उपोषण केले. मात्र तीन पिढ्या उलटूनही न्याय मिळाला नाही. दरम्यान, समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे ,भाऊ महालुंगे व समितीने वारंवार पाठपुरावा केल्यावर अखेर या धरणाच्या बुडीताखाली जमिनी गेलेल्या १२७ कुटुंबाना मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या निर्णयामुळे न्याय मिळणार आहे.

आयुक्त परदेशी यांनी आपल्या दालनात झालेल्या बैठकीत ५० वर्षापासूनचा हा प्रश्न असून ज्या ग्रामस्थांनी आपल्या जमिनी भातसा धरणासाठी दिल्या त्या बुडीत क्षेत्रातील शेतकºयांच्या वारसांना पात्रतेप्रमाणे नोकरी देण्याचे धोरण ठरविण्यात आले.त्या अनुषंगाने सहायक संचालक,नगररचना विभाग, ठाणे यांच्या कार्यालयात पुनर्वसनचा आराखडा मंजूर झाला असून त्या ९७ कुटुंबांना भातसाधरण वसाहतीमध्ये प्लॉट वाटप करण्यातबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हा प्रश्न आचारसंहितेच्या आधी निकाली काढणार असल्याची माहिती दिली.

२३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली१२७ पैकी अनेक कुटुंब गायब झाली. काहींचा तपासच लागत नाही तर काहींच्या नोंदीच नसल्याने १२७ पैकी फक्त ९७ कुटुंबांची नोंद सरकारकडे आहे. त्या ९७ पैकी ५२ वर्षात ९६ कुटुंबप्रमुखांचे निधन झाले. ५० वर्षांनंतर पुनर्वसन होणार आहे. - बबन हरणे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Damधरण