शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएविरोधात आंदोलनास्त्र

By admin | Updated: April 14, 2017 03:05 IST

एमएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्याला वसईसह रायगड जिल्ह्यातून जोरदार विरोध सुरु झाला आहे. जनतेचा विकास आराखडा मंचाने आराखड्याविरोधात

वसई : एमएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्याला वसईसह रायगड जिल्ह्यातून जोरदार विरोध सुरु झाला आहे. जनतेचा विकास आराखडा मंचाने आराखड्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर वसई पर्यावरण संवर्धन समितीने आराखडा मराठी प्रसिद्ध करून हरकती नोंदवण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. बिल्डरांच्या सोयीसाठी मुंबईचे नाव वापरून महामुंबई करण्यासाठी एमएमआरडीएने प्रारुप आराखडा तयार केला आहे. मात्र, शेतकऱ्यांना काय हवे आहे याचा विचार न करता आराखडा लादायचा प्रयत्न केला असल्याने त्याविरोधात आता जनता उठाव केल्याशिवाय राहणार नाही, असे जनतेचा विकास आराखडा मंचाचे मनवेल तुस्कानो सांगितले. मंचाच्यावतीने वसईसह रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा घेण्यात येत आहेत. त्यात आता रस्त्यावर उतरूनच विरोध करावा लागेल, असे आवाहन केले जात आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये चंद्रशेखर प्रभू, मनवेल तुस्कानो, उल्का महाजन, अ‍ॅड. सुरेखा दळवी, शैलेद्र कांबळे, मिलन म्हात्रे, आमदार धैर्यशिल पाटील, आमदार बाळाराम पाटील, आमदार विवेक पाटील, भूषण पाटील, मुक्ता श्रीवास्तव, पायस मच्याडो, पॅट्रीक फर्नांडीस यांनी मार्गदर्शन केले. हा आराखडा मुठभर श्रीमंतांच्या आणि बिल्डरांच्या सोयीसाठी बनवला असून हरित पट्ट्यात एफएसआय वाढ, औद्योगिक वसाहती, सेंट्रल कॉरिडोर, लोकांचे विभाजन आणि अनेक जुलमी नियोजने करण्यात आल्याची माहिती सभांमध्ये दिली गेली. (प्रतिनिधी)आराखडा मराठीत प्रसिद्ध करण्याची मागणीप्रारुप आराखडा मराठीत प्रसिद्ध करून हरकती मागवण्याची मुदत वाढवण्यात यावी, अन्यथा कोर्टात दाद मागितली जाईल, असा इशारा पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी राज्य सरकारला दिला आहे. एमएमआरडीएच्या हद्दीत येणाऱ्या सात महापालिकांसाठी आराखडा जाहिर केल्यानंतर २७ मार्चपर्यंत हरकती मागवण्यात आल्या.आराखडा इंग्रजीत असल्याने त्यावर सर्वसामान्यांना हरकती नोंदवता आल्या नाहीत. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून एमएमआरडीए रिजनही मराठी आहे. असे असताना आराखडा इंग्रजीत प्रसिद्ध करून मराठीचा अवमान करण्यात आला आहे, असा आरोप वर्तक यांनी केला आहे. आराखड्याविरोधात वसईतून आतापर्यंत तीस हजारांहून अधिक हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत. आराखड्याविरोधात सभांनाही गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. पुढची सभा शुक्रवारी संध्याकाळी रानगाव येथे होणार असून त्यात चंद्रशेखर प्रभू आणि फा. फ्रान्सिस दिब्रिटो मार्गदर्शन करणार आहेत.