शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Vidhan Sabha 2019: 'दहशतीचा ‘पोपट’ केवळ निवडणुकांच्या हंगामात बोलतो!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 03:30 IST

क्षितिज ठाकूर यांची नाव न घेता प्रदीप शर्मा यांना टोला

वसई : लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की वसईतील दहशतीचा मुद्दा उफाळून येतो; इतरवेळी सारेकाही आलबेल असते. दहशतीचा हा ‘पोपट’ केवळ निवडणुकांच्या हंगामात बोलतो, असा टोला आमदार क्षितिज ठाकूर यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नाव न घेता लगावला.बहुजन विकास आघाडीतर्फे विरार येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी ठाकूर यांनी ‘साहेब’ कुठे राहतात, असा सवाल केला. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी अंधेरी, मुंबई असे म्हटल्यावर आ. ठाकूर यांनी त्या ठिकाणी किती लेडीज बार आहेत, असा प्रतिप्रश्न केला. आमची दहशत आहे असे म्हणता ना, तर होय आमची दहशत आहेच. म्हणूनच आम्ही येथे लेडीज बार सुरू करू दिले नाहीत, येथे आजही एकटी महिला रिक्षाने मध्यरात्रीनंतरही एकट्याने घरी सुरक्षितपणे जाऊ शकते, असेही ठाकूर यांनी ठणकावले.‘आम्ही भेदभाव केला नाही’धर्म, वंश, जात, लिंग, भाषा आणि प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता बविआने सर्वांना एका परिवारात आणले. येथील जनतेचा बविआवर विश्वास असून जेव्हा उत्तर भारतीयांना मारहाण करून पिटाळले जात होते, गुजरात्यांवर हल्ले होत होते तेव्हा हे एन्काउंटर स्पेशालिस्ट कुठे होते? आजही बविआकडे असलेली कार्यकर्त्यांची प्रचंड फौज, ताकद, विकासकामे आणि जनतेचा बविआवर असलेला प्रचंड विश्वास यामुळे सैरभैर झालेली मंडळी नसलेल्या दहशतीचा कळीचा मुद्दा उपस्थित करीत असल्याचेही आमदार ठाकूर यांनी म्हटले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना