शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Maharashtra Election 2019: वसईत कोण घेणार आघाडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 00:47 IST

Maharashtra Election 2019: पालघर लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यावर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या दृष्टीनेच शिवसेना आणि मित्र पक्ष वसईत उतरलेले दिसतात.

- आशिष राणेवसई : पालघर लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यावर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या दृष्टीनेच शिवसेना आणि मित्र पक्ष वसईत उतरलेले दिसतात. मात्र, मुळातच विरोधकांकडे कधीही सत्ता नव्हती. त्यामुळे विरोधक विकासाच्या मुद्यावर काही बोलू शकत नाहीत, असे मानणारा एक वर्ग येथे दिसून येतो.

महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांनी जरी प्रचारासाठी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीवर कितीही आरोप केले तरी विजय पाटील यांनी आपल्या प्रचारात आजवर केलेली विकासकामे मांडण्यावर भर दिला. वसई मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मिळविण्यासाठी बविआ व महायुती या दोघांचेही जोरदार प्रयत्न दिसले. मनसेसह अन्य तीन उमेदवार रिंगणात आहेत. तरी येथे मुख्य लढत बविआ विरूद्ध शिवसेना अशीच दिसणार आहे.

वसईत पराभव झाल्यानंतर बविआने वसई मतदारसंघावर साडेचार वर्षे संपूर्ण लक्ष केंद्रित केले. जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रि य करणे, जनसंपर्क कार्यालये सुरू करणे यासह ग्रामीण भागात घटलेला जनाधार वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. याचबरोबर गावोगावी संपर्क ठेवत नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिल्याचे दिसते.

दुसरीकडे वसई आणि नालासोपारा या दोन्ही जागा भाजपला हव्या होत्या. मात्र या दोन्ही जागा सेनेच्या वाट्याला आल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच येथील भाजपचा मुख्य गटाने शिवसेनेचा प्रचार करणार नाही, असा पवित्राही घेतला आहे. त्यामुळे दोघांचे भांडण बविआचा फायदा होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. याशिवाय येथील ख्रिस्ती मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतो, हेही महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरPradeep Sharmaप्रदीप शर्माShiv Senaशिवसेनाvasai-acवसई