शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

कळंब, भुईगाव समुद्रकिनारे ग्रामस्थांकडून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:26 IST

कोरोना प्रादुर्भाव वाढला

विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसईतील कळंब, भुईगाव समुद्रकिनाऱ्यांवर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पर्यटकांना बंदी केली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ग्रामस्थांनी ही दक्षता घेतली आहे.

पर्यटकांनी किनाऱ्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केल्याने कळंबपाठोपाठ भुईगावचा किनाराही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. कळंबच्या किनाऱ्यावर बंदी घातल्यानंतर पर्यटकांनी भुईगाव किनाऱ्याकडे धाव घेतल्याने आता हाही किनारा बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर मुंबई आणि तालुक्यातील हजारो पर्यटक सुटीच्या दिवशी येत असतात. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ही गर्दी पुन्हा ओसंडू लागली होती. छटपूजेच्या निमित्तानेही या किनाऱ्यावर हजारो भाविकांची गर्दी होणार होती. मात्र, शासनानेच बंदी घातल्यामुळे दोन दिवस सर्व किनारे बंद ठेवण्यात आले होते. हीच संधी साधून कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर येण्यास स्थानिक ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे. कळंब किनाऱ्यावर बंदी घातल्यामुळे पर्यटकांनी भुईगावच्या किनाऱ्याकडे आपला मोर्चा वळवला होता. शनिवारी आणि रविवारी सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती.

दरम्यान, विरार-ग्लोबल सिटीला लागून असलेले म्हारंबळपाडा हे गाव निसर्गसंपन्न आहे. शहराला लागून असले तरी अद्याप गावपण टिकून असल्याने अनेक लोक या ठिकाणी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी येत असतात. शिवाय, या गावाला लागूनच खाडी असल्याने अनेक जण या ठिकाणी निवांतपणा व्यतीत करतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून स्वच्छताकर म्हणून १० रुपये कर आकारला जातो. शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर शहरातील बगिचे, मैदाने, किनारे या ठिकाणी हळूहळू सूट देण्यात आली होती. त्यामुुुळे म्हारंबळ इथेही पर्यटकांचा ओघ वाढू लागला होता. मात्र, विरार ग्लोबल सिटी आणि परिसरातील नागरिक म्हारंबळपाडा येथे जाण्यास पसंती देत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थ कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार