शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

कळंब, भुईगाव समुद्रकिनारे ग्रामस्थांकडून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:26 AM

कोरोना प्रादुर्भाव वाढला

विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसईतील कळंब, भुईगाव समुद्रकिनाऱ्यांवर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पर्यटकांना बंदी केली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ग्रामस्थांनी ही दक्षता घेतली आहे.

पर्यटकांनी किनाऱ्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केल्याने कळंबपाठोपाठ भुईगावचा किनाराही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. कळंबच्या किनाऱ्यावर बंदी घातल्यानंतर पर्यटकांनी भुईगाव किनाऱ्याकडे धाव घेतल्याने आता हाही किनारा बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर मुंबई आणि तालुक्यातील हजारो पर्यटक सुटीच्या दिवशी येत असतात. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ही गर्दी पुन्हा ओसंडू लागली होती. छटपूजेच्या निमित्तानेही या किनाऱ्यावर हजारो भाविकांची गर्दी होणार होती. मात्र, शासनानेच बंदी घातल्यामुळे दोन दिवस सर्व किनारे बंद ठेवण्यात आले होते. हीच संधी साधून कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर येण्यास स्थानिक ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे. कळंब किनाऱ्यावर बंदी घातल्यामुळे पर्यटकांनी भुईगावच्या किनाऱ्याकडे आपला मोर्चा वळवला होता. शनिवारी आणि रविवारी सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती.

दरम्यान, विरार-ग्लोबल सिटीला लागून असलेले म्हारंबळपाडा हे गाव निसर्गसंपन्न आहे. शहराला लागून असले तरी अद्याप गावपण टिकून असल्याने अनेक लोक या ठिकाणी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी येत असतात. शिवाय, या गावाला लागूनच खाडी असल्याने अनेक जण या ठिकाणी निवांतपणा व्यतीत करतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून स्वच्छताकर म्हणून १० रुपये कर आकारला जातो. शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर शहरातील बगिचे, मैदाने, किनारे या ठिकाणी हळूहळू सूट देण्यात आली होती. त्यामुुुळे म्हारंबळ इथेही पर्यटकांचा ओघ वाढू लागला होता. मात्र, विरार ग्लोबल सिटी आणि परिसरातील नागरिक म्हारंबळपाडा येथे जाण्यास पसंती देत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थ कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार