शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

जव्हारमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 4:24 AM

शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच पक्षांनी बैठका सुरु केल्या आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.

- हुसेन मेमनजव्हार : शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच पक्षांनी बैठका सुरु केल्या आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. नविन नियमानुसार नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार असून, २०११ च्या जनगणनेनुसार नगर परिषदेच्या आठ प्रभागातून १७ उमेदवार मिळून एकुण १२ हजार ४१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.यंदाची निवडणूक थोडी वेगळी असून सर्वच पक्षांना नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी मतदारराजाची मिन्नतवारी करावी लागणार आहे. त्यातूनच शहरामध्ये दिवाळीच्या काळामध्ये विविध पक्षांच्या व काही उमेदवारांच्यावतीने मतदारांना मेवा-मिठाईचे वाटप करण्यात आले होते. या निवडणूकीचे आरक्षण जुलै महिन्यातच निश्चित झाल्याने काही चतुर उमेदवारांनी किरकोळ विकासकामे करुन त्या-त्या प्रभागावर आपले वर्चस्व दाखवून पक्षश्रेष्ठींवर दबाव निर्माण केला आहे.पक्षांचे नाराज कार्यकर्ते, पदाधिका-यांनी आपल्याला तिकीट मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्याने दुसºया पक्षात प्रवेश केल्याच्या घटना घडल्या असून अजूनही काही उलथापालथी होण्याची शक्यता आहे. मागील निवडणूकीत राष्टÑवादीने १७ पैकी १४ उमेदवार विजयी करून एकहाती सत्ता काबीज केली होती. मात्र राजकीय सुंदोपसुदींमुळे त्यांच्या दहा नगरसेवकांनी बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला होता. त्याला पक्षाने न्यायालयात आव्हान देऊन फुटीर नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यश मिळविले होते.कटू आठवणी लक्षातराष्टÑवादीशी द्रोह करणाºया पाच नगरसेवकांनी घरवापसी केल्यामुळे त्यांना पुनर्जीवन मिळले होते. मात्र, सत्ताधारी पक्षातील या उलथापालथीमुळे विकासकामे रखडून बकाल स्थिती निर्माण झाली होती. तसेच मागील ६ महिन्यापूर्वी दहा नगरसेवकांपैकी पाच अपात्रांच्या प्रभागामध्ये फक्त ५ महिंन्यांसाठी निवडणूका होऊन जव्हार प्रतिष्ठानचे चार तर १ अपक्ष निवडून आले. याचा त्रास झाल्याने आता मतदार चांगल्या उमेदवारांच्या प्रतिक्षेत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार