शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

लॉकडाऊन कालावधीत बड्या देवस्थानांचे उत्पन्न घटले, पालघर जिल्ह्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:12 AM

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून शासनाने मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद केली आहे . यात्रा, उत्सव, बोहाडे यावरही बंदी असल्याने हे उत्सव झाले नाहीत.

- शशिकांत ठाकूर

कासा : कोरोना संकटात खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील मंदिरे दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांची देणगी, दान थांबल्याने मंदिरांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मंदिरांवर अवलंबून असलेल्या दुकानदार व व्यावसायिकांवर बेकारीची स्थिती निर्माण झाली आहे.लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून शासनाने मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद केली आहे . यात्रा, उत्सव, बोहाडे यावरही बंदी असल्याने हे उत्सव झाले नाहीत. पालघर जिल्ह्यात डहाणूची महालक्ष्मी, विरारची जीवदानी माता येथे विविध उत्सव साजरे केले जातात. डहाणूच्या महालक्ष्मी देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेपासून दरवर्षी १५ दिवस भरते. तसेच जीवदानी देवी मंदिरात व महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सव काळात मोठी गर्दी असते. जूचंद्र येथील चंडिकादेवीची यात्रा, केळव्याची शीतलादेवी यात्रा, सातपाटीची व अर्नाळ्याची रामनवमी यात्रा, जव्हारचा शेकडो वर्षांची परंपरा असलेला तीन दिवस भरणारा जगदंब (बोहाडा) हे मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत होणारे उत्सव रद्द झाले. त्यामुळेही मंदिराच्या उत्पनात मोठी घट झाली असून अनेकांचा रोजगार बुडाला आहे.डहाणू तालुक्यात महालक्ष्मी देवीची भरणारी जिल्ह्यातील ही सर्वात मोठी यात्रा १५ दिवस चालते. यात्रा कालावधीत पालघरबरोबर मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यांतील भाविकांबरोबरच गुजरात, सिल्वासा, दिव-दमण येथून दरदिवशी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. मात्र, या वर्षी कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर येथील १५ दिवसांची भरणारी यात्रा रद्द झाली. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच करमणुकीचे खेळ व खाद्यपदार्थ यामुळे खरेदीसाठी येथे मोठी गर्दी असते. रोज लाखोंची उलाढाल होते. देणगी आणि दान स्वरूपात निधी जमा होतो. दुकानदार आणि तरूणांना यात्रेतून मोठा रोजगार मिळतो. मात्र, यावर्षी यात्रा रद्द झाल्याने हे सर्व उत्पन्न बुडाले आहे. जव्हार व विक्रमगड तालुक्यातील जगदंबा उत्सव व बोहाडे लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आले. जव्हारमध्ये १४ गावांत हे उत्सव होतात. जिल्ह्यातील मोठी देवस्थाने असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात व विरारच्या जीवदानी मंदिरात वर्षभर दर्शनासाठी मोठी गर्दी असते. यंदा दर्शन बंद असल्यामुळे मंदिर परिसरातील रोजगार बुडाला आहे.आॅनलाइन देणगीदारांचे प्रमाण खूप कमी असल्याने जिल्ह्यातील मंदिरातील उत्पन्न चार ते पाच टक्क्यांवर आले आहे. मंदिरे दर्शनासाठी बंद असली तरीही आंतरिक पाठ पूजा सुरू आहेत. दरम्यान, उत्पन्न घटल्याने इतर सोयीसुविधा बरोबरच मंदिरातील सेक्युरिटी, कर्मचारी, सफाई कामगार यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन मंदिर बंद असल्याने फुल हार व प्रसाद दुकाने चालविणार्यावर मोठी आर्थिक नामुष्की ओढवली आहे. लॉकडाऊन कालावधीत मंदिर ट्रस्टकडून मदतही करण्यात आली.लॉकडाऊनमुळे मंदिराच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. भविष्यात कर्मचारी पगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच फुलहार दुकानदारांची मोठी आर्थिककोंडी झाली आहे.- संतोष देशमुख, अध्यक्ष, श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विवळवेढेमंदिर बंद आहे. त्यामुळे दानपेटी व देणगी उत्पन्न बंद झाले आहे. लोकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आॅनलाइन देणगीचे प्रमाणही क ाही प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे हे उत्पन्न पाच टक्क्यांवर आले आहे.- प्रदीप तेंडुलकर, सचिव, श्री जीवदानीदेवी संस्थान, विरार

टॅग्स :palgharपालघर