शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

पैसे नाहीत म्हणून मला नाकारले तिकीट-विश्वनाथ पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 05:17 IST

राजकारणामध्ये अनेकदा ज्याच्याजवळ पैसा नाही अशा उमेदवाराला व्यापक पक्ष हितासाठी उमेदवारी दिली जाते.

वाडा : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रचंड आर्थिक बळ लागते आणि त्याबाबत विश्वनाथ पाटील हे पुरेसे सक्षम नाहीत म्हणून त्यांना भिवंडी मतदार संघातून लोकसभेचे उमेदवारी दिली जाऊ नये अशी शिफारस केल्याने माझा पत्ता कट झाला परंतु २०१४ मध्ये मला पक्षात बोलवून उमेदवारी दिली तेव्हा माझी गरीबी काँग्रेसला दिसली नाही काय?, माहित नव्हती काय? असा सवाल विश्वनाथ पाटील यांनी लोकमतकडे मनोगत व्यक्त करतांना केला.

राजकारणामध्ये अनेकदा ज्याच्याजवळ पैसा नाही अशा उमेदवाराला व्यापक पक्ष हितासाठी उमेदवारी दिली जाते. त्याचा खर्च पक्ष करतो अशी परंपरा आहे. हे पाहून तरी पैसा या कारणासाठी मला उमेदवारी नाकारायला नको होती २०१४ ची माझी आर्थिक स्थिती आणि आजची आर्थिक स्थिती यात कोणताही फारसा फरक पडलेला नाही. माझी संपत्ती फारशी वाढलेलीही नाही अथवा तिच्यात घटही झालेली नाही. असे असतांना आर्थिक दृष्टया गरीब म्हणून मला उमेदवारी कशी नाकारली गेली असा सवालही त्यांनी केला.

उमेदवारी देतांना केवळ आर्थिक सबलता हाच निकष लावला जात नाही उमेदवाराला असलेला जनाधार देखील पाहिला जातो. नंतर उमेदवारीबाबत निर्णय घेतला जातो. ते योग्यच आहे अन्यथा पक्षाच्या उमेदवाऱ्या धन्ना सेठच्याच पदरात जातील तसे होऊ नये यासाठीच निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांनाही काँग्रेसपक्ष उमेदवारी देत आलेला आहे याचा काँग्रेसला कसा विसर पडला असाही सवाल त्यांनी केला. आता मी खूप पुढे निघून गेलो आहे. मंगळवारच्या शहापूर येथील मेळाव्यात नेमलेली समिती उद्या म्हणजे शुक्रवारी तिचा निर्णय देणार आहे त्यानुसार मी माझा राजकीय निर्णय घेणार आहे असेही त्यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले.दरम्यान, पाटील यांनी बहुजन समाज पक्ष व अन्य एका पक्षाशी उमेदवारी मिळावी म्हणून संपर्क साधला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. मात्र त्याला पाटील यांच्याकडून दुजोरा मिळू शकलानाही.निर्णय घेणाºया समितीत या मान्यवरांचा होता समावेशशहापूर येथे दि. १/४/२०१९ रोजी शेतकरी, कष्टकरी, भूमिपुत्र, अल्पसंख्यानक समाजाच्या झालेल्या निर्धार मेळाव्यात भिवंडी लोकसभा मतदार संघाबाबत धोरण ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. त्यात पुढील मान्यवरांचा समावेश होता. गुरु नाथजी टावरे, लल्लन भाई, भिवंडी, हरिभाऊ खाडे, शहापूर, गोविंद सवर, वाडा, भालचंद्र ठाकरे, ठाणे, शरद आंबो पाटील, भिवंडी, प्रफुल पाटील, पराग पष्टे, वाडा, काशिनाथजी तिवरे, शहापूर, शरद पाटील, वाडा (मशाल), अ‍ॅड. वैशाली घरत, मुरबाड, डॉ. विवेक पाटील, ठाणे, भगवान सांबरे, पडघा, परशुराम सावंत सर, वाडा, तानाजी मोरे, भिवंडी (देवा ग्रुप), दिनेश निमसे, शहापूर, योगेश निपुरते, युवराज ठाकरे, वाडा, निलेश गायकवाड, वाडा, अ‍ॅड. फनाडे, मुरबाड, अविनाश पाटील, पालघर, भगवान कोर, कल्याण, रवी चंदे, शहापूर, नरेंद्र पाटील, भिवंडी, जगन पाटील, भिवंडी.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूक