शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

हरित लवादाकडून एमआयडीसीतील प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 05:44 IST

राष्ट्रीय हरित लवादाने तारापूरच्या प्रदूषणकारी उद्योगांना त्याची भरपाई म्हणून कोट्यवधी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

- हितेन नाईकपालघर : तारापूर एमआयडीसीतील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात अनेक तक्र ारी करूनही प्रदूषण मंडळाकडून ठोस कारवाई होत नसल्याने राष्ट्रीय हरित लवादानेच आता तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे प्रदूषण मंडळाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने तारापूरच्या प्रदूषणकारी उद्योगांना त्याची भरपाई म्हणून कोट्यवधी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगातून निर्माण होणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी २००६ मध्ये उभारलेल्या सामुदायिक रासायनिक सांडपाणी प्रक्रि या केंद्राची क्षमता २५ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन इतकी होती. सांडपाण्यावर चार वेळा प्रक्रि या केल्यानंतरच ते प्रक्रि या केलेले पाणी बाहेर सोडले जाणे अपेक्षित असताना हा नियम पायदळी तुडवीत प्रदूषित रासायनिक पाणी बाहेर सोडले जात होते. त्यामुळे परिसरातील नवापूर, आलेवाडी, मुरबे, सातपाटी, उच्छेळी-दांडी आदी अनेक भागातील नदी, नाले, समुद्र, खाड्या, खाजण येथील वनसंपदा, भातशेती, मत्स्य संपदा संपुष्टात येण्याचे प्रकरणात वाढ झाली होती. तसेच काही कारखानदार प्रदूषित पाणी भूगर्भात सोडत असल्याने पाण्याचे साठे प्रदूषित होत परिसरातील अनेक गावांतील बोअरवेलला प्रदूषित पाणी येऊ लागले होते. यामुळे किनारपट्टीवरील नागरिक कॅन्सर, त्वचा रोग, दमा, टीबी अशा जीवघेण्या आजाराला बळी पडू लागले होते.या प्रदूषणावर ठोस उपाययोजना करून प्रदूषण करणाºया कंपनीविरोधात कडक कारवाईच्या आंदोलनाकडे गांभीर्याने न पाहता उलट रासायनिक सांडपाणी प्रक्रि या केंद्राची क्षमता वाढवून सांडपाणी पाईपलाईनद्वारे थेट नवापूर गावाच्या समोरील समुद्रात ८.१ कि.मी. आत सोडण्याचा प्रस्ताव मंजूर करीत कामही सुरू करण्यात आले होते. या प्रदूषित पाण्यामुळे समुद्रातील प्रदूषण वाढून समुद्रातील मत्स्य संपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त करत या विरोधात हरित लवादात याचिका दाखल करण्यात आली. दिल्लीच्या राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तारापूर औद्योगिक क्षेत्र हे जगातील १ नंबरचे प्रदूषित क्षेत्र जाहीर केले.

टॅग्स :palgharपालघर