शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

माध्यमिकचा पहिला दिवस स्वच्छतेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:47 PM

शासकीय यंत्रणेचा गोंधळ

तलासरी : सोमवारपासून इयत्ता ९ वी ते १२ वी माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला, पण सोमवारचा शाळांचा पहिला दिवस शाळा स्वच्छतेतच गेला. शाळा सुरू होणार म्हणून काही मुले शाळेत आली, पण ऐनवेळी त्यांना पुन्हा घरी पाठविण्यात आले. मात्र, शाळेत आलेल्या मुलांची संख्या ही अल्प होती. त्यामुळे शाळा सुरू झाली, तरी शाळेत किती मुले येतील, याबाबत शंकाच आहे.

माध्यमिक शाळा इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला, पण गोंधळलेल्या शासकीय यंत्रणेमुळे सोमवारचा दिवस मुलांना न शिकविता स्वच्छतेत गेला. सोमवारी शाळा भरविण्याच्या दृष्टिकोनातून शाळांची स्वच्छता करून सॅनिटायझरने फवारणी करून घेण्यात आली. काही शाळांनी मुलांना मास्कही वाटले, पण ऐनवेळी अधिकाऱ्यांचा  आदेश आला. शाळा भरविण्याच्या दृष्टीने सोमवारी नियोजन करा व मुलांना परत पाठवून द्या, असे सांगितल्याने आलेल्या मुलांना पुन्हा घरी पाठविण्यात आले. तलासरी तालुक्यातील शाळा सुरू होतील, पण शाळांत किती मुले उपस्थित राहतील, याबाबत शंका आहे. तलासरी भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे सुट्टीमध्ये मुले काम करण्यास कारखान्यात जातात. सध्या कोरोनामुळे बालकामगार म्हणून गुजरातमधील कारखान्यात कामाला जात असल्याने त्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शिक्षकांना त्रासाचे जाणार आहे. शाळा सुरू करण्यासाठी शाळांना फवारणी केली, पण मुलांना शिकविणाऱ्या शिक्षकांची कोरोना चाचणी केव्हा होणार, मानधनावरील शिक्षकांच्या नेमणुका कधी होणार, मुलांच्या कोरोना चाचण्या या सगळ्यांचा विचार गोंधळलेली शासकीय यंत्रणा करणार आहे की नाही, हा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSchoolशाळा