शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू; उच्च दाबाच्या वाहिनीसाठी जागा न देण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:08 IST

उच्च दाबाच्या वाहिनीसाठी जागा न देण्याचा निर्धार : पोलीस बळाचा वापर करू पाहत असल्याचा आरोप

वाडा : तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असून, या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम महापारेषणने हाती घेतले आहे; मात्र या वाहिनीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे वाहिनीस तीव्र विरोध दर्शवून जागा न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याने महापारेषण आता पोलीस बळाचा वापर करू पाहात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

गुरुवारी काही शेतकऱ्यांना वाडा पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी समज दिली. शेतकरी ऐकतच नसतील तर पोलीस बंदोबस्त घेऊन सरकारचा प्रकल्प पूर्ण करा, असे महापारेषणच्या अधिकाऱ्यांना संख्ये यांनी सांगितले. यावरून महापारेषण आता पोलीस बळाचा वापर करू पाहात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२२० के.व्ही. तारापूर-बोरीवली आणि बोईसर-घोडबंदर-कुडूस अशी उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे. वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे; मात्र हे करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा पूर्वकल्पना न देता या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातच सन २०१६ साली बनवलेल्या नकाशाप्रमाणे हे काम न करता महापारेषणने मनमानी कारभार करत आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरू केले आहे. यात डाकिवली गावातील अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. येथील बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असून, बाधित शेतकऱ्यांचे लागवडी क्षेत्र संपुष्टात येणार आहे. ज्या जमिनीतून ही वाहिनी जात आहे,  ती जमीन मातीमोल होणार असल्याने शेतकरी प्रचंड  संतापले आहेत.

शेतकरी तीव्र विरोध करत असल्याचे  महापारेषणच्या लक्षात आल्याने त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी शेतकऱ्यांना हा सरकारचा प्रकल्प असून, त्याला विरोध करू नका, अशी समज दिली. तर शेतकऱ्यांचे कमीत कमी कसे नुकसान होईल, असे पाहा, असे महापारेषणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. याउपर शेतकरी ऐकतच नसतील तर पोलीस अधीक्षकांकडून रीतसर पोलीस बंदोबस्त घ्या, असे पारेषणच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी