शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

'शेतकरी कायदा रद्द होणार नाही, आंदोलनकर्ते राजकीय पक्षांचे'; रामदास आठवलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 4:53 PM

शेतकरी आंदोलनाच्या पार्शवभूमीवर आठवले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

- नितिन पंडीत 

भिवंडी: दिल्लीत सुरु असलेले शेतकरी अंदोलन हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून ते राजकीय पक्षांचे व राजकीय संघटनांचे आंदोलन आहे. त्यामुळे या आंदोलनात देशभरातील शेतकरी सामील नसून केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पारित केलेला शेतकरी कायदा रद्द होणार नाही. असे वक्त्याव केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी भिवंडी एका खासगी कंपनीच्या कार्यालय उदघाटनाप्रसंगी केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्शवभूमीवर आठवले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावात असलेल्या गोदाम संकुलनात उभारलेल्या मास्टर मॉडलिंग या कंपनीच्या उदघाटन सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना शेतकरी आंदोलनावर वरील वक्तव्य केले.

मोदी सरकारने नव्याने कृषी कायदा लागू केला. मात्र या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागतील आणि भांडवलदार मलाई खातील असा देशभरातील शेतकऱ्यांनी एल्ल्गार पुकारत गेल्या १५ दिवसापासून दिल्लीत कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी अंदोलन सुरु केले आहे. मात्र भाजप नेत्यांसह त्यांचे मित्र पक्षातील नेत्यांनीही कृषी कायदा रद्द होणार नाही. असे वारंवार विधान करीत आहेत. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळला आहे. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही भाजप नेत्याप्रमाणे कृषी कायदा रद्द होणार नाही. मात्र त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. असे सांगत केंद्र सरकाराने लागू केलेल्या कृषी कायदाची पाठराखण केली. 

केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी लागू केला. मात्र मोदी सरकारच्या विरोधात असलेल्या सर्वच राजकीय पक्ष शेतकरी आंदोलनाच्या आड मोदी सरकारला बदनाम करण्याचा डाव रचत असल्याचेही रामदास आठवले यांनी आरोप करीत विरोधकांवर निशाणा साधला. तर लवकरच कृषी कायदावर केंद्र सरकार तोडगा काढून शेतकऱ्यांचे अंदोलन थांबविण्यात यशस्वी होतील असा अशावाद शेवटी आठवले यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीRamdas Athawaleरामदास आठवलेFarmer strikeशेतकरी संपMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार