शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

प्रत्येकाचीच लढण्याची इच्छा, पण उमेदवार मिळता मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 09:47 IST

शिवसेना, भाजप, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच

जगदीश भोवड, लोकमत न्यूज नेटवर्क, वसई: ठाणे आणि कल्याण मतदारसंघ हा आमचा गड असल्याचे सांगत त्यावर भाजपने दावा केलेला असतानाच आता पालघर लोकसभा मतदारसंघावरूनही युतीतील शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. त्यावेळी महाविकास आघाडीत शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या मतदारसंघावरून स्पर्धा आहे. त्यातच बहुजन विकास आघाडी रिंगणात असल्याने येथील लढत  उत्सुकता वाढवणारी ठरेल.

पालघरचे प्रतिनिधित्व  शिवसेनेचे राजेंद्र गावित करत आहेत. पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असला, तरी या लोकसभा मतदारसंघात वसई, विरार व नालासोपारा या शहरी भागांचाही समावेश आहे. तेथे बहुजन विकास आघाडीचा वरचष्मा आहे. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी डहाणू माकपकडे, विक्रमगड राष्ट्रवादीकडे, पालघर शिवसेनेकडे; तर बोईसर, नालासोपारा आणि वसई हे मतदारसंघ बहुजन विकास आघाडीकडे आहेत. मात्र, येथील खासदार शिवसेनेचा आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित हे ८८ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता.

सत्तांतर व शिवसेनेतील फुटीनंतर  गावित शिवसेनेच्या शिंदे गटात गेले. त्यामुळे त्या पक्षाकडून तेच पुन्हा रिंगणात असतील.  भाजपच्या नेत्यांनीही मागील निवडणुकीतील चिंतामण वनगा यांच्या विजयाचा दाखला देत या मतदारसंघावर दावा सांगायला सुरुवात केली आहे. त्यासाठी सध्याच्या खासदारांचा संदर्भ देत व  ताकदीचा अंदाज घेत भाजपने अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण केल्याने युतीत हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो, उमेदवारी कोणाला मिळते यावरच सारे चित्र आहे. बविआचे बळीराम जाधव उमेदवार असू शकतात. युती व महाविकास आघाडीची लढत झाली, तर मतविभागणीवर बविआचे लक्ष असेल.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा केला आहे व स्थानिक स्वराज्य संस्थांतील यश, विक्रमगडची आमदारकी यांचा दाखला दिला आहे, तर शिवसेनेने सद्यस्थितीनुसार हा मतदारसंघ आमचाच असल्याचा दावा केलाय. राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्या नावाची चर्चा आहे.

ठाकरे गटाकडून कोण?

शिवसेनेच्या ठाकरे गटाला हा मतदारसंघ स्वत:कडेच हवा असला, तरी उमेदवार कोण, हा प्रश्नच आहे. सध्या तरी ठाकरे गटाकडून कुणाचेही नाव चर्चेत नाही.

पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व

१ ऑगस्ट २०१४ रोजी  पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पूर्वी येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसचे दामू शिंगडा हे पाचवेळा खासदार होते. मात्र, २००९ मध्ये या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी अनपेक्षितपणे विजय मिळविला. त्यानंतर मात्र काँग्रेसला संधी मिळाली नाही.

गावितांना दोन वेळा संधी 

२०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर चिंतामण वनगा खासदार म्हणून निवडून गेले होते. मात्र, २०१८ मध्ये त्यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात काँग्रेसमधून येऊन भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या राजेंद्र गावितांचा विजय झाला होता. या निवडणुकीत चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी पक्षात दुर्लक्ष होत असल्याचे कारण देत बंडखोरी करत शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला आणि गावित विजयी झाले. नंतर २०१९च्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, पण भाजपने राजेंद्र गावित हा आपला उमेदवार शिवसेनेला दिला. तेव्हा ते विजयी झाले. मात्र, अवघ्या दोन वर्षांत त्यांनी तीन पक्षांचे प्रतिनिधित्व केले.

मतांचे गणित होते कसे? 

२०१९च्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली आणि ५,८०,४७९ मते मिळवली. तेव्हा बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४,९१,५९६ मते मिळाली. त्यापूर्वी २०१८ ला भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर  पोटनिवडणूक झाली. तेव्हा वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांनी बंडखोरी करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भाजपने काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. त्यांना २,७२,७८२ मते मिळाली, तर  श्रीनिवास वनगा यांना २,४३,२१० मते मिळाली. त्या आधीच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे  चिंतामण वनगा हे युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यांना ५,३३,२०१ मते मिळाली, तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना  २,९३,६८१ मते मिळाली.

टॅग्स :palgharपालघर