शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे साकडे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 6:10 AM

जिल्ह्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन साठी भूसंपादनाचं काम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला रिलायन्सने दिला नसल्याची जाणीव

पालघर : रिलायन्स गॅस पाईप लाईन आणि कर्म ब्रह्मांड गृहप्रकल्पाच्या व्यवस्थापकांकडून सर्वसामान्य जनतेची झालेली आर्थिक फसवणूक तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर येथे सुरू करणे या विषयावर मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखेंच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाºयाची भेट घेऊन तातडीच्या कारवाईची मागणी केली.

जिल्ह्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन साठी भूसंपादनाचं काम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला रिलायन्सने दिला नसल्याची जाणीव डॉ. नारनवरे यांना शिष्टमंडळाने करून दिली. जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट दर शेतक-यांना देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असतांना देखील ते पायदळी तुडवून शेतक-यांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात केली गेलेली आहे असा आरोप करून शेतकºयांनी विरोध केला तर पोलीस बळाचा वापर करु न, ही पाईपलाईन टाकण्याचं काम हुकूमशाही पद्धतीने सुरुच असल्याचा दावा शिष्टमंडळाने केला. या विषयावर ताबडतोब निर्णय घेऊन, बाधित संबंधित शेतकर्यांना न्याय द्यावा अशी ताठर भूमिका शिष्टमंडळाने घेतल्याने, येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल असे नारनवरे यांनी आश्वस्त केले.केळवे रोड येथील बहुचर्चित कर्म ब्रह्मांड विकासकांकडून ग्राहकांना भुलविणाºया जाहिराती देऊन भुरळ पाडली आणि त्याच ग्राहकांकडून गृहप्रकल्प उभारण्याच्या नावाखाली आगाऊ रक्कम व प्रत्येक महिन्याला उरलेल्या किमतीचा सम हप्ता घेऊन करोडो रु पयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. कष्टाने जोडलेले पैसे यात गुंतवल्यानंतर आज दोन वर्षांनंतर देखील प्रत्यक्ष जागेवर कोणतेही बांधकाम झालेलं नाही. पैसेही नाहीत व घरेही नाहीत अशी गुंतवणूकदारांची स्थिती झाल्याने चिंता व्यक्त करून मनसे शिष्टमंडळाने विकासकांवर आर्थिक अपहार प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली. करून फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे परत करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी केली.जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर येथे सुरू करणे गरजेचे असतांना देखील त्या बाबत प्रशासनाची भूमिका उदासीनतेची असल्याचे स्पष्ट मत मनसे शिष्टमंडळाने व्यक्त केले. पालघर जिल्ह्याचा विस्तार आणि लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याने वसई येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अपुरे पडत असल्याचे संखे यांनी नारनवरे यांच्या निदर्शनास आणून दिले.सदर चर्चेत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष भावेश चुरी, तालुकाध्यक्ष मंगेश घरत,तलासरी तालुकाध्यक्ष सुनील ईभान, पालघर शहराध्यक्ष सुनील राउत, मनविसे लोकसभाध्यक्ष धीरज गावड, महिला शहराध्यक्ष गीता संखे, मनसे पदाधिकारी शैलेश हरमळकर, सागर शिंदे, रूपेश पाटिल, उदय माने,निलिम स्ंखे,वैभव घरत,निलेश पाटील,तन्मय संखे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीRelianceरिलायन्सMNSमनसे