शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्प हटविण्यासाठी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाची पालिकेवर धडक   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 20:19 IST

उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महासभेत आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले. 

भार्इंदर - उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महासभेत आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले. 

धारावी बेट जनआक्रोश मोर्चा समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरसेवकांना दिलेल्या निवेदनात गेल्या १० वर्षांपासुन उत्तन घनकचरा प्रकल्पात सुमारे १० लाख टन कचय््रााचा डोंगर उभा राहिला आहे. त्याचा वाद सध्या उच्च न्यायालयासह राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रलंबित आहे. लवादाच्या आदेशानुसार पालिकेने महाराष्टÑ प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) निर्देशानुसार कचय््राावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रीया करणे आवश्यक असतानाही पालिकेने त्याचे उल्लंघन केले. एमपीसीबीने हि बाब सतत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने लवादाने पालिकेला १८ महिन्यांत प्रकल्प स्थलांतर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान त्याला विलंब लागण्याची शक्यता हेरुन पालिकेला कचय््राावर तात्पुरती प्रक्रीया करण्याकरीता व्यवस्था करण्याचे आदेश दिले. परंतु, ३० महिने उलटल्यानंतरही पालिकेने कोणतीही हालचाल न करता कचय््राावरील  प्रक्रीयेसाठी ७ वर्षांसाठी परस्पर कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यासाठी एमपीसीबीची परवानगीच घेतली नसल्याचा दावा मोर्चाने निवेदनात केला आहे. सध्या प्रकल्पात टाकण्यात येणाय््राा सुक्या कचय््राातील केवळ प्लास्टिक कचय््रााचेच वर्गीकरण करण्यात येत आहे. ओल्या कचय््राावरील प्रक्रीया पालिकेने अद्याप सुरु केली नसल्याने येत्या पावसाळ्यात कचय््राातील सांडपाणी लोकवस्तीत पसरुन रोगराई पसरण्यासह डोंगराखालील शेती व पाण्याच्या स्त्रोतात मिश्रित होऊन शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पालिकेने त्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसुन प्रकल्पात कचय््रााचे प्रमाण वाढून त्यातील दुर्गंधीमुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांपासुन स्थानिकांनी हा प्रकल्प हटविण्यासाठी सतत पालिकेकडे पाठपुरावा केला. प्रसंगी न्यायालयात धाव घेतली. परंतु, पालिकेने सर्वांचीच फसगत केल्याचा आरोप कोलासो यांनी केला आहे. हे प्रश्न प्रशासनाला अनुत्तरीत करणारे असल्याचा दावा करीत  लोकप्रतिनिधींनी उत्तनवासियांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या स्थलांतरासाठी येत्या १ मे पासून प्रकल्पात येणाय््राा कचय््रााच्या गाड्या रोखून धरण्याचा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आल्याने पालिकेने येत्या २७ एप्रिलला समितीच्या सर्व सदस्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. मात्र त्यात प्रशासनाकडून सदस्यांचे समाधान न झाल्यास आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे कोलासो यांनी सांगितले.

  या प्रकल्पाच्या स्थलांतराबाबत शिवसेना नगरसेविका शर्मिला बगाजी-गंडोळी व काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी बुधवारच्या महासभेत लक्षवेधी मांडली होती.   त्यावर चर्चा न करताच अक्षय तृतीयेमुळे सभा तहकुब झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहिर केले. त्यामुळे शर्मिला यांनी लक्षवेधीवर चर्चा न केल्यास त्याचा आपण सुरुवातीलाच निषेध नोंदवित असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर चर्चाच झाली नाही. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक