शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

घनकचरा प्रकल्प हटविण्यासाठी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाची पालिकेवर धडक   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 20:19 IST

उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महासभेत आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले. 

भार्इंदर - उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महासभेत आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले. 

धारावी बेट जनआक्रोश मोर्चा समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरसेवकांना दिलेल्या निवेदनात गेल्या १० वर्षांपासुन उत्तन घनकचरा प्रकल्पात सुमारे १० लाख टन कचय््रााचा डोंगर उभा राहिला आहे. त्याचा वाद सध्या उच्च न्यायालयासह राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रलंबित आहे. लवादाच्या आदेशानुसार पालिकेने महाराष्टÑ प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) निर्देशानुसार कचय््राावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रीया करणे आवश्यक असतानाही पालिकेने त्याचे उल्लंघन केले. एमपीसीबीने हि बाब सतत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने लवादाने पालिकेला १८ महिन्यांत प्रकल्प स्थलांतर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान त्याला विलंब लागण्याची शक्यता हेरुन पालिकेला कचय््राावर तात्पुरती प्रक्रीया करण्याकरीता व्यवस्था करण्याचे आदेश दिले. परंतु, ३० महिने उलटल्यानंतरही पालिकेने कोणतीही हालचाल न करता कचय््राावरील  प्रक्रीयेसाठी ७ वर्षांसाठी परस्पर कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यासाठी एमपीसीबीची परवानगीच घेतली नसल्याचा दावा मोर्चाने निवेदनात केला आहे. सध्या प्रकल्पात टाकण्यात येणाय््राा सुक्या कचय््राातील केवळ प्लास्टिक कचय््रााचेच वर्गीकरण करण्यात येत आहे. ओल्या कचय््राावरील प्रक्रीया पालिकेने अद्याप सुरु केली नसल्याने येत्या पावसाळ्यात कचय््राातील सांडपाणी लोकवस्तीत पसरुन रोगराई पसरण्यासह डोंगराखालील शेती व पाण्याच्या स्त्रोतात मिश्रित होऊन शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पालिकेने त्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसुन प्रकल्पात कचय््रााचे प्रमाण वाढून त्यातील दुर्गंधीमुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांपासुन स्थानिकांनी हा प्रकल्प हटविण्यासाठी सतत पालिकेकडे पाठपुरावा केला. प्रसंगी न्यायालयात धाव घेतली. परंतु, पालिकेने सर्वांचीच फसगत केल्याचा आरोप कोलासो यांनी केला आहे. हे प्रश्न प्रशासनाला अनुत्तरीत करणारे असल्याचा दावा करीत  लोकप्रतिनिधींनी उत्तनवासियांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या स्थलांतरासाठी येत्या १ मे पासून प्रकल्पात येणाय््राा कचय््रााच्या गाड्या रोखून धरण्याचा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आल्याने पालिकेने येत्या २७ एप्रिलला समितीच्या सर्व सदस्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. मात्र त्यात प्रशासनाकडून सदस्यांचे समाधान न झाल्यास आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे कोलासो यांनी सांगितले.

  या प्रकल्पाच्या स्थलांतराबाबत शिवसेना नगरसेविका शर्मिला बगाजी-गंडोळी व काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी बुधवारच्या महासभेत लक्षवेधी मांडली होती.   त्यावर चर्चा न करताच अक्षय तृतीयेमुळे सभा तहकुब झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहिर केले. त्यामुळे शर्मिला यांनी लक्षवेधीवर चर्चा न केल्यास त्याचा आपण सुरुवातीलाच निषेध नोंदवित असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर चर्चाच झाली नाही. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक