शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

वंचितांनी सोपाऱ्यात फोडली जलवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:42 IST

बिनधास्त पाणीचोरी : चोरटयांना मुबलक प्रामाणिक करदात्यांच्या नशिबी मात्र सततची निर्जळी

आशिष राणेवसई : नालासोपारा शहरात वसई विरार महापालिकेची वाहिनी फोडून पाण्याची बिनधास्त चोरी केली जात आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून जलवाहिनी फोडून केली जाणारी पाणी चोरी दिवसेंदिवस महापालिकेची डोकेदुखी ठरत आहे. तर या पाणीचोरीच्या समस्येवर तोडगा म्हणून स्थापन केलेले फिरते पथक नेमके शहरात कुठे आणि काय काम करते आहे, कुठे व कशी गस्त घालत काम करते आहे. याचा शोध आता स्वत: पालिका आयुक्तांनीच घ्यायला हवा.

दरम्यान वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाºया धरणात आता कुठे पाऊस पडल्याने मुबलक पाणी जमा झाले असले तरी शहराच्या अनेक भागांत अजूनही नळजोडण्या नसल्याने तेथे पाण्याची मात्र भीषण टंचाई आहे. नालासोपारा पूर्व परिसरात आज ही केवळ हंडाभर पाण्यासाठी लोकांना पाण्याची चोरी करावी लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे. तर नालासोपारात संतोष भुवन, डहाणू बाग, वाकण पाडा, श्रीराम नगर, बिलालपाडा गावराई पाडा पेल्हार या परिसरात महापालिकेचा पाणी पुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. यामुळे या विभागातील लोकांना एक तर पाणी विकत घ्यावे लागते अथवा पाण्यासाठी वाहिनी फोडून पाण्याची चोरी करावी लागत आहे. बिलाल पाडा येथे व्हॉल्व्ह तोडून स्थानिक पाणी भरत आहेत तर श्रीराम नगर येथे त्यांनी जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह जवळच सिमेंटचे बांधकाम करून पाईप लाइन टाकली आहे. येथून पिण्यासाठी पाणी तर भरले जातेच, शिवाय कपडे आणि गाड्याही धुतल्या जात आहेत.पाणीपुरवठा विभाग कोमात

दरवेळी अधिकारी वर्ग आम्ही असे प्रकार आढळून आले तर तातडीने कारवाई करतो, पण या विभागात लोक वारंवार जलवाहिनी फोडत आहेत व पालिका व त्यांचे फिरते गस्ती पथक नेमकं कुठं काम करीत आहेत. हे मात्र स्वत: शहर अभियंता माधव जवादे यांना सुध्दा माहीत नाही, हे मात्र नवल आहे.

वसई-विरारमध्ये कमी दाबाने पाणीवसई : वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाºया सूर्या धरणाच्या नवीन योजनेची पाईप लाईन धुकटन फिल्टर प्लांट येथे शनिवारी दुपारच्या सुमारास नादुरु स्त झाल्याने पालिकेने तात्काळ तिच्या दुरु स्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करून सदरचे काम रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. दरम्यान महापालिकेची नवीन सूर्या योजना वगळता फक्त जुन्या योजनेतून पाणी पुरवठा सुरू होता. तर रविवारी रात्री पासून या दोन्ही योजनेतून पाणी पुरवठा चालू झाला असून अधून मधून महावितरण च्या वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यामुळे ही येथील पाणी पुरवठा अनियमित होत आहे. किंबहूना जलवाहिनी दुरु स्ती आणि वीज पुरवठा खंडित होणे ह्या दोन्ही कारणांमुळे रविवारी व पुढील दोन दिवस वसई विरार शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित होणार आहे.

टॅग्स :Waterपाणी