शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाववाढीविरोधात वसईत निदर्शने; कांदा दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:53 IST

सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले

वसई : कांद्याच्या भावाने शंभरी पार केल्याने आता सर्वसामान्यांच्या आहारातूनच कांदा गायब झाला आहे. कांद्यासह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुपटीने वाढल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेटच कोलमडले आहे. या दरवाढीमुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष असून जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेसतर्फेवसई रोड पश्चिम येथे अंबाडी रोडवर निषेध आंदोलन करण्यात आले.

सध्या दिवसेंदिवस कांद्याच्या भावामध्ये वाढ होत असल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. एकूणच या कांदा भाववाढीविरोधात वसई-विरार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओनील अल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच वसईच्या अंबाडी रोड येथे जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देत आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधी घोषणाही दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढली आहे. कांदा भाववाढीबरोबरच इतर जीवनावश्यक वस्तूंचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत.  ओनिल अल्मेडा यांनी सांगितले की, भाज्या, कडधान्ये यांच्यासह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अशाच प्रकारे भाववाढ होत राहिली, तर देशामध्ये प्रचंड असंतोष पसरून जनता रस्त्यावर येईल आणि त्यावर नियंत्रण आणणे केंद्र व राज्य प्रशासनाला कठीण होऊन बसेल. म्हणूनच केंद्र सरकारने या भाववाढीसंदर्भात नियंत्रण ठेवून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे आवश्यक असल्याचे मत अल्मेडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

नागरिकत्व दुरुस्तीविरोधातही आंदोलन याबरोबरच जिल्हा काँग्रेसने वादग्रस्त नागरिकत्व विधेयकालाही विरोध दर्शवला आहे. या दुरुस्ती विधेयकाला देशभरातून विरोध होत असताना आसाम राज्यासहीत ईशान्य भारतामध्ये हिंसक आंदोलन होत आहेत. या विधेयकाविरोधात सुद्धा वसईत निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात शनिवारी, १४ डिसेंबर रोजी काँग्रेसतर्फे दिल्ली येथील रामलीला मैदानावर ‘भारत बचाव आंदोलन’ छेडण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी वसई-विरार जिल्ह्यांमधून बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते रवाना झाले आहेत, असेही अल्मेडा यांनी सांगितले.

टॅग्स :onionकांदाcongressकाँग्रेसVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी