शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे नागरिकांना धोका; अन्न व औषध प्रशासनाचे नियम धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 11:42 PM

वसईत विभागाचे कार्यालयच नाही

विरार : वसई - विरारमध्ये भेसळखोरांनी आपले बस्तान मांडले असून खाद्यपदार्थांत भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी राजरोसपणे खेळ सुरू आहे. असे असतानाही अन्न तसेच औषध प्रशासन अथवा महापालिका आरोग्य विभाग याबाबत गंभीर नाही. बनावट मावा, रासायनिक पद्धतीने फळे पिकवणे, घाणीच्या विळख्यात खाद्यपदार्थ अनेक कारखाने सुरु आहे. विशेष म्हणजे वसईत अन्न व औषध विभागाचे कार्यालय नाही. यामुळे नागरिकांनी तक्र ार करायची कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.

वसई तालुक्यातील नालासोपारा येथे चक्क घाणीच्या साम्राज्यात खाकरा बनविणारे शेकडो कारखाने कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे सारेच नियम धाब्यावर बसवून घाणीच्या विळख्यात वेगवेगळ्या स्वादाचे खाकरे बनवून मुंबई, ठाणे, पालघर येथे विक्री केले जात आहेत. मात्र या कारखान्यांवर आजतयागत कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.

खाकरा बनवणारे शेकडो कारखाने मोरगाव, नागीनदास, अलकापुरी, संतोष भुवन परिसरात बिनधास्त सुरु आहेत. त्यातील बहुतांश कंपनीकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे कोणतेही परवाने नाहीत. तसेच या कारखान्यांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून कधीच पाहणी केली जात नाही. यामुळे घाणीच्या साम्राज्यात हे लघुउद्योग उभे राहत आहेत.

या कंपनीत रोजंदारीवर महिलांद्वारे वेगवेगळ्या स्वादाचे खाकरे बनविले जातात. आणि कोणत्याही कंपनीच्या नावाने सीलबंद करून मुंबई, ठाणे, पालघर आदी परिसरात वितरित केले जातात. विशेष बाब म्हणजे काही मोठे फरसाणवाले सुद्धा या कंपनीकडून आपले खाकरे बनवून केवळ आपल्या नावाचे पॅकिंग करून सर्रास गुणवंत पदार्थ म्हणून विकतात.मनुष्य बळ कमी असल्याने सर्वच ठिकाणी पाहणी करणे शक्य नाही. तक्र ारी आल्यास आम्ही कारवाई करतो. शासनाने मनुष्यबळ वाढविल्यास भेसळखोरांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. नागरिकांनी असे पदार्थ घेतना सावधानता बाळगावी. - पी.एन. वाघमारे, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी, ठाणे

टॅग्स :FDAएफडीए