शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पतसंस्थांच्या पिग्मी कलेक्शनला फटका, ४० कोटींची बचत थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:21 IST

कोरोना व्हायरस भारतात व वसईत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मध्यंतरी काही काळ मंदावलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून सरकार आता पुन्हा लॉकडाऊनबाबतीत पुनर्विचार करीत आहे.

- आशिष राणे  वसई : कोरोना व्हायरस भारतात व वसईत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मध्यंतरी काही काळ मंदावलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून सरकार आता पुन्हा लॉकडाऊनबाबतीत पुनर्विचार करीत आहे.खरेतर, जसा कोरोनामुळे संपूर्ण जगभर नोकरी, उद्योगधंदे, घरची परिस्थिती आदींवर याचा विपरीत परिणाम झाला, तसा याचा आर्थिक फटका राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थांचा तालुका म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या वसईतील सहकारी पतसंस्था व त्यामधील पिग्मी एजंट अथवा वसुली अधिकारीवर्गावरही होत आहे.सुरुवातीपासूनच एक ऐतिहासिक व्यापारी शहर म्हणून वसईची ओळख आहे. वसई तालुक्यात शहर व ग्रामीण भाग येतो. मोठ्या प्रमाणावर असलेला व्यापारीवर्ग, किराणा व इतर माल भाजीपाला  खरेदीसाठी नागरिक, छोटे-मोठे व्यापारी इथे येत असतात. त्यामुळे शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते. म्हणूनच, या ठिकाणी शहरात तीन सहकारी बँका, आठ ते दहा मल्टीस्टेट छोट्या सोसायट्या, पतसंस्था व इतर फायनान्स व इतर छोटी-मोठी फायनान्स अशा १०० हून अधिक सहकारी संस्था आहेत. त्या संस्थांच्या माध्यमातून कर्जदार व बिगर कर्जदार खातेदारांकडून दररोज सुमारे ३०० एजंटांच्या माध्यमातून हे पिग्मी कलेक्शन केले जाते. छोटे दुकानदार हे आपल्या रोजच्या व्यवसायातून बचत म्हणूनदेखील रोज १० रुपयांपासून ते १०० ते ५०० रुपयांपर्यंत कलेक्शन भरत होते, तर काही व्यावसायिकांनी खेळते भांडवल म्हणून यावर कर्जही घेतले आहे. ते या पिग्मीच्या माध्यमातून संस्था, बँकांकडे भरत असतात. मात्र, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रावरदेखील मोठे संकट ओढवले आहे.  सामान्यजनांची तर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. लवकरात लवकर हे संकट दूर व्हावे, यासाठी संपूर्ण जगभरात प्रार्थना होऊ लागल्या आहेत. यामुळे देशाचीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थादेखील धोक्यात आली आहे. सोबत, सहकाराचा तालुका असलेल्या वसई तालुक्यात या क्षेत्रालाही सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. ३०० हून अधिक लाेकांना राेजगारnसहकारी बँका व पतसंस्था आदी संस्थांबरोबरच या संस्थेत पिग्मी एजंट म्हणून दैनंदिन ठेव गोळा करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात तालुक्यातील सहकारी बँका व पतसंस्था यांची आकडेवारी पाहिली, तर ८० पतसंस्था व ३ सहकारी बँका आहेत. यात अवलंबून ३०० हून अधिक पिग्मी एजंट व वसुली अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ही उलाढाल पाहिली तर हा आकडा ४० ते ५० कोटींवर जातो. पिग्मी एजंटना कमिशनरूपातून उत्पन्न मिळते.nकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मागील मार्च २०१९ पासून लाॅकडाउन लागू करण्याचा निर्णय तर घेतला, मात्र पुन्हा आता आपण लॉकडाऊनच्या दिशेने जात  असून कोरोनाच्या पुन: पुन्हा सावटामुळे रोजगारनिर्मिती व व्यवसाय  व्यवस्थापन आणि आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. याचा सर्वाधिक फटका बँकेच्या व सहकारी पतसंस्थांमधील कलेक्शनवर पडला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार