शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मासेमारी बंदीवरून केंद्र - राज्यात गोंधळ; केंद्राचा आदेश १५ जूनपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 01:35 IST

राज्य सरकार म्हणते १ जूनपासून बंदी

- हितेन नाईकपालघर : महाराष्ट्र शासनाचा मासेमारी बंदी कालावधी १ जूनपासून आहे. तर केंद्र शासनाने हाच कालावधी १५ जूनपासून असल्याचे आदेश काढले आहेत. तर राज्य शासनाने १ जून ते ३१ जुलै असे मासेमारी बंदीचे आदेश काढले आहेत. केंद्र आणि राज्य शासनामधील समन्वयाच्या अभावाचा फटका मच्छीमारांना बसत असून कोणाचे आदेश पाळावेत, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

१ जून ते ३१ जुलै या कालावधीत समुद्रात वादळी वारे वाहून जीवित वा वित्तहानी होऊ नये तसेच मासे प्रजननक्षम बनून लहान पिल्लांची चांगली वाढ व्हावी म्हणून प्रत्येक वर्षी राज्य शासन पावसाळी मासेमारी बंदी कालावधी घोषित करते. परंतु मार्च महिन्यात अंड्यातून बाहेर आलेली पापलेट, बोंबील, दाढा, रावस आदी माशांची लहान पिल्ले समुद्रात विहार करीत असताना मे महिन्यात अशा लहान पिल्लाची पुरेशी वाढ होऊ न देता त्यांची मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. त्यामुळे माशांची पुरेशी वाढ न होता लहान पिलांची बेसुमार कत्तल केली जात असल्याने माशांचे समुद्रातील उत्पादन घटू लागले होते. त्यामुळे १ मे ते ३१ जुलै असा तीन महिन्याचा मासेमारी कालावधी केंद्र आणि राज्य शासनाने घोषित करावा, अशी मागणी सहकारी संस्था, मच्छीमार संघटना करीत आल्या आहेत.

पावसाळी मासेमारी बंदी कालावधी कमी पडत असल्याने तो वाढून मिळावा यासाठी एनएफएफ या राष्ट्रीय संघटनेबरोबरच महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने अनेक आंदोलने केली असताना केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त डॉ. संजय पांडे यांनी २० मार्च रोजी एक आदेश पारित केला आहे. या आदेशान्वये पूर्व किनारपट्टी भागात १५ एप्रिल ते ३१ मे असा, तर पश्चिम किनारपट्टीवर १५ जून ते ३१ जुलै असा पावसाळी बंदी कालावधीचा नवीन आदेश पारित केला आहे. मच्छीमारांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला हरताळ फासत १५ दिवस मासेमारी कालावधी कमी केल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या वर्षीही राज्य शासनाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडून सहकारी संस्थांना १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा पावसाळी बंदी कालावधीचा आदेश आल्यानंतर आता नव्याने केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहआयुक्तांकडून राज्य शासनाच्या १२ सागरी मैल पुढे असलेल्या ईईझेड क्षेत्रात १५ जूनपर्यंत मासेमारी करता येणार आहे. परंतु राज्य शासनाच्या १२ सागरी मैल (नॉटिकल) भागातून जिल्ह्यातील मच्छीमार मासेमारीला ईईझेड क्षेत्रात गेल्यास मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाईची भूमिका असेल का? याबाबत वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन मागवीत असल्याचे पालघर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी सांगितले. मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकांचा करारही ३१ मे रोजी संपत असल्याने मत्स्यव्यवसाय विभाग कारवाई करू शकणार नाही.

केंद्र शासनाने ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी १५ दिवसांनी कमी केला असून १ जूनपासून ओएनजीसीचा सर्व्हे सुरू होत असल्याने अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने सर्व किनारपट्टीवर मच्छीमार काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध करणार आहेत.- दामोदर तांडेल, अध्यक्ष,अखिल मच्छीमार कृती समिती

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCentral Governmentकेंद्र सरकार