शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी बंदीवरून केंद्र - राज्यात गोंधळ; केंद्राचा आदेश १५ जूनपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 01:35 IST

राज्य सरकार म्हणते १ जूनपासून बंदी

- हितेन नाईकपालघर : महाराष्ट्र शासनाचा मासेमारी बंदी कालावधी १ जूनपासून आहे. तर केंद्र शासनाने हाच कालावधी १५ जूनपासून असल्याचे आदेश काढले आहेत. तर राज्य शासनाने १ जून ते ३१ जुलै असे मासेमारी बंदीचे आदेश काढले आहेत. केंद्र आणि राज्य शासनामधील समन्वयाच्या अभावाचा फटका मच्छीमारांना बसत असून कोणाचे आदेश पाळावेत, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

१ जून ते ३१ जुलै या कालावधीत समुद्रात वादळी वारे वाहून जीवित वा वित्तहानी होऊ नये तसेच मासे प्रजननक्षम बनून लहान पिल्लांची चांगली वाढ व्हावी म्हणून प्रत्येक वर्षी राज्य शासन पावसाळी मासेमारी बंदी कालावधी घोषित करते. परंतु मार्च महिन्यात अंड्यातून बाहेर आलेली पापलेट, बोंबील, दाढा, रावस आदी माशांची लहान पिल्ले समुद्रात विहार करीत असताना मे महिन्यात अशा लहान पिल्लाची पुरेशी वाढ होऊ न देता त्यांची मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. त्यामुळे माशांची पुरेशी वाढ न होता लहान पिलांची बेसुमार कत्तल केली जात असल्याने माशांचे समुद्रातील उत्पादन घटू लागले होते. त्यामुळे १ मे ते ३१ जुलै असा तीन महिन्याचा मासेमारी कालावधी केंद्र आणि राज्य शासनाने घोषित करावा, अशी मागणी सहकारी संस्था, मच्छीमार संघटना करीत आल्या आहेत.

पावसाळी मासेमारी बंदी कालावधी कमी पडत असल्याने तो वाढून मिळावा यासाठी एनएफएफ या राष्ट्रीय संघटनेबरोबरच महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने अनेक आंदोलने केली असताना केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त डॉ. संजय पांडे यांनी २० मार्च रोजी एक आदेश पारित केला आहे. या आदेशान्वये पूर्व किनारपट्टी भागात १५ एप्रिल ते ३१ मे असा, तर पश्चिम किनारपट्टीवर १५ जून ते ३१ जुलै असा पावसाळी बंदी कालावधीचा नवीन आदेश पारित केला आहे. मच्छीमारांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला हरताळ फासत १५ दिवस मासेमारी कालावधी कमी केल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या वर्षीही राज्य शासनाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडून सहकारी संस्थांना १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा पावसाळी बंदी कालावधीचा आदेश आल्यानंतर आता नव्याने केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहआयुक्तांकडून राज्य शासनाच्या १२ सागरी मैल पुढे असलेल्या ईईझेड क्षेत्रात १५ जूनपर्यंत मासेमारी करता येणार आहे. परंतु राज्य शासनाच्या १२ सागरी मैल (नॉटिकल) भागातून जिल्ह्यातील मच्छीमार मासेमारीला ईईझेड क्षेत्रात गेल्यास मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाईची भूमिका असेल का? याबाबत वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन मागवीत असल्याचे पालघर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी सांगितले. मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकांचा करारही ३१ मे रोजी संपत असल्याने मत्स्यव्यवसाय विभाग कारवाई करू शकणार नाही.

केंद्र शासनाने ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी १५ दिवसांनी कमी केला असून १ जूनपासून ओएनजीसीचा सर्व्हे सुरू होत असल्याने अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने सर्व किनारपट्टीवर मच्छीमार काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध करणार आहेत.- दामोदर तांडेल, अध्यक्ष,अखिल मच्छीमार कृती समिती

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCentral Governmentकेंद्र सरकार