शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

शाळाप्रवेशदिनीच मिळणार पुस्तके; १६ लाख ५ हजार १०९ पुस्तके मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 02:23 IST

१ ली ते ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्याना शाळेच्या पाहिल्याच दिवशी समारंभपूर्वक नव्याकोर्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केले जाणार आहे.

- हितेन नाईकपालघर : १ ली ते ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्याना शाळेच्या पाहिल्याच दिवशी समारंभपूर्वक नव्याकोर्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केले जाणार आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा मार्फत आठ तालुक्यांमधील ३ लाख ४ हजार ६८० विद्यार्थ्यांकरिता १६ लाख ५ हजार १०९ पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी लोकमत ला दिली.गतवर्षी प्रमाणेच यंदाही शाळेच्या पाहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांंच्या हाती नवी कोरी पुस्तकं दिली जाणार असल्याने त्यांना खऱ्या अर्थाने आनंददायी शिक्षणाची प्रत्यक्ष अनुभूती मिळणार आहे. या मध्ये जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील १ ली ते ८ वी इयत्तांमधील विद्यार्थ्यांंचा समावेश असणार आहे. पालघर जिल्हयातील आठ तालुक्यांसाठी शिक्षण विभागाकडून गतवर्षी विविध विषयांच्या १६ लाख ९२ हजार ५७८ पुस्तकांची मागणी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडे करण्यात आली होती. तर त्या पैकी १६ लाख ४४ हजार ७११ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती.तर या शैक्षणिक वर्षाकरिता ३ लाख ४ हजार६८० विद्यार्थ्यांकरिता १६ लाख ५ हजार १०९ इतका पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे.पालघर तालुक्यातील १ ली ते ८ वी च्या ५० हजार ४८२ विद्यार्थ्यांकरिता २ लाख ७४ हजार २०३ पाठ्यपुस्तकें, वसई ६८ हजार २९८ विद्यार्थ्यांंकरिता ३ लाख ७४ हजार ७५९ पाठ्यपुस्तकं , डहाणू मध्ये ६७ हजार १८६ विद्यार्थ्यांकरिता, ३ लाख ४२ हजार ४४१ पाठ्यपुस्तकें, तलासरी मध्ये २९ हजार ८३६ विद्यार्थ्यांंकरिता १ लाख ५७ हजार ९३ पाठ्यपुस्तकं, जव्हार २१ हजार ३५२ विद्यार्थ्यांंकरिता १ लाख ८ हजार 645 पाठ्यपुस्तकं, मोखाडा मध्ये १४हजार ९७० विद्यार्थ्यांकरिता ७७ हजार ७३३ पाठ्यपुस्तकं , वाडा २७ हजार ७५४ विद्यार्थ्यांकरीता १ लाख ४४ हजार ९८१ पाठ्यपुस्तकं आणि विक्रमगड तालुक्यात २४ हजार ८३१ विद्यार्थ्यांंकरिता १ लाख २५ हजार ३१७ पाठ्यपुस्तक अशी संपूर्ण जिल्ह्यातील ३ लाख ४ हजार ६८० विद्यार्थ्यांंसाठी १६ लाख ५ हजार १०९ विविध विषयांच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. तर गतवर्षी विक्र मगड तालुक्यात १ लाख ३८ हजार २५ , वाडा - १ लाख ५३ हजार ११२ , डहाणू-३ लाख ७९ हजार १५७ , मोखाडा -७० हजार ७३८, जव्हार -७६ हजार ९६९, वसई -३ लाख ८३ हजार ४८०, पालघर - २ लाख ७६ हजार ४४७, तलासरी -१ लाख ६६ हजार ७६५ अशी एकूण १६ लाख ४४ हजार ७११ इतकी सर्व विषयांची मिळून पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली होती.शाळांमधून पाठ्यपुस्तकं उपलब्ध होऊ लागल्याने विशेषत: गरीब आदिवासी पालकांचा आर्थिक फायदा होणार आहे. शिवाय पाल्याच्या शाळेत जाऊन शिक्षकांकडून पाठ्यपुस्तकांची यादी घ्या, त्यानंतर पुस्तकांच्या दुकानात जाऊन रांगेत उभे राहून घेतलेली पुस्तकं पुन्हा शाळेत जाऊन वर्गशिक्षकांना दाखवा हा पालकांचा त्रास आणि डोकेदुखी वाचणार आहे.जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र १ ली व ८ वी च्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलल्याने नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्या नंतर तात्काळ त्याचे वाटप करण्यात येईल.- राजेश कंकाळ,शिक्षणाधिकारी, प्राथमिक

टॅग्स :Schoolशाळा