शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

पालघरमध्ये भाजपची सत्ता संपुष्टात; वाशिम, नंदुरबारमध्ये आघाडीला संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 06:39 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १८ जागा जिंकत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १८ जागा जिंकत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार उसळी घेत १५ जागा जिंकल्याने या जिल्ह्यावरील भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. लोकसभा, विधानसभपाठोपाठ जिल्हा परिषदेच्या सत्तेतूनही भाजप हद्दपार झाली आहे. निवडणुकीपूर्वी महाआघाडीच्या वाटाघाटी यशस्वी न झाल्याने निकालानंतर एकत्र येण्याचे संकेत शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले होते. त्यानुसार आता जिल्हा परिषदेवर महाआघाडी सत्तारूढ होईल. शिवसेनेने ५७ पैकी ४६ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील १८ जागी विजय मिळवत त्या पक्षाने जिल्ह्यातील वर्चस्व सिद्ध केले. त्यात पालघर तालुक्यात त्या पक्षाच्या दोन जागा वाढून तेथे त्यांनी १० जागा मिळवल्या, तर वसई १, डहाणू ३, विक्र मगड १, जव्हार १, वाडा २ तर वसई १ अशा १८ जागा या पक्षाने जिंकल्या.

तलासरी, मोखाडा या दोन तालुक्यांत त्यांची पाटी कोरी राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवरून थेट १५ जागांपर्यंत उसळी घेतली. विक्रमगड, वाडा आणि जव्हार तालुक्यात जिजाऊ संस्थेचे नीलेश सांबरे आणि आमदार सुनील भुसारा यांच्या ताकदीच्या जोरावर राष्ट्रवादीने भाजपचे वर्चस्व (पान ९ वर)(पान १ वरुन) मोडीत काढले.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही मागील चार जागांमध्ये दोनची भर घालत सहा जागा जिंकल्या. तसेच तलासरी तालुक्यावरील वर्चस्व सिद्ध केले. मागील २१ जागांवरून भाजपची घसरगुंडी होत तो पक्ष १० जागांवर स्थिरावला. आठ पंचायत समित्यांपैकी एकाही पंचायत समितीवर भाजपला वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही.जिल्ह्यात विधानसभेचे ३ आमदार असूनही बहुजन विकास आघाडीला मागील १० जागा राखता आल्या नाहीत. यावेळी फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. बालेकिल्ला असलेल्या वसई तालुक्यातही त्यांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या वेळी अपक्षांच्या संख्येत वाढ झाली. त्यांनी तीन जागा मिळवल्या. काँग्रेसने एक जागा राखण्यात यश मिळविले. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाआघाडी करण्याबाबत स्थानिक नेत्यांची प्राथमिक स्तरावर बोलणी झाली होती. मात्र आपले बलस्थान असलेल्या तालुक्यांत मित्रपक्षांना वाटा देण्यात शिवसेनेने फार स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे काही ठिकाणी परस्परांना मदत करण्याचे, मैत्रीपूर्ण लढण्याचे आश्वासन देत सर्व पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले. निकालानंतर सत्तेसाठी एकत्र येण्याचा निर्णय तेव्हाच घेण्यात आला होता.>पालघर जिल्हा परिषद पक्षीय बलाबलएकूणजागा - ५७शिवसेना - १८राष्ट्रवादी - १५भाजप - १०माकप - ६बहुजन विकास आघाडी - ४अपक्ष - ३काँग्रेस - १मनसे - ०

>सहा जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबलजिल्हा काँग्रेस राष्टÑवादी शिवसेना भाजप इतर एकूणनागपूर ३० १० १ १५ २ ५८नंदुरबार २३ ३ ७ २३ ० ५६धुळे ७ ३ ४ ३९ ३ ५६वाशिम ९ १२ ६ ७ १८ ५२पालघर १ १५ १८ १० १३ ५७अकोला ४ ३ १३ ७ २६ ५३(भारिप-बहुजन महासंघाला अकोल्यात २३ तर वाशिममध्ये ९ जागा)

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा