शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

‘जस्टीस फॉर अन्वय नाईक’चे बॅनर; शिवसेना आक्रमक, कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 12:11 AM

सेना आक्रमक, कारवाईची मागणी

पारोळ : अलिबाग येथील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषी असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. याप्रकरणी अर्णव गोस्वामी अटकेवरून विविध क्रिया-प्रतिक्रियांना उधाण आले आहे. ही कारवाई आकसापोटी केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्रातील राजकीय विरोधकांकडून केला जात आहे, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करणाऱ्या अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीविरोधात पोलिसांनी उचित कारवाई केली पाहिजे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडिया आणि समाजस्तरावरून उमटत आहेत.

दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत वसई शहर शिवसैनिकांनी वसई पश्‍चिमेतील ओमनगर या ठिकाणी ‘जस्टीस फॉर अन्वय नाईक’ अशी बॅनरबाजी करत अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेचे समर्थन केले आहे.

महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सातत्याने अर्णव गोस्वामी यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू केली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यावर नाना तऱ्हेचे आरोप करण्याचा सपाटाच अर्णव गोस्वामी यांनी लावला होता. अशात टीआरपी घोटाळ्यात अर्णव गोस्वामी यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याने अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना अटक केली.  

टॅग्स :Anvay Naikअन्वय नाईकPoliceपोलिसarnab goswamiअर्णब गोस्वामीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार