शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

‘जस्टीस फॉर अन्वय नाईक’चे बॅनर; शिवसेना आक्रमक, कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 07:08 IST

सेना आक्रमक, कारवाईची मागणी

पारोळ : अलिबाग येथील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषी असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. याप्रकरणी अर्णव गोस्वामी अटकेवरून विविध क्रिया-प्रतिक्रियांना उधाण आले आहे. ही कारवाई आकसापोटी केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्रातील राजकीय विरोधकांकडून केला जात आहे, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करणाऱ्या अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीविरोधात पोलिसांनी उचित कारवाई केली पाहिजे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडिया आणि समाजस्तरावरून उमटत आहेत.

दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत वसई शहर शिवसैनिकांनी वसई पश्‍चिमेतील ओमनगर या ठिकाणी ‘जस्टीस फॉर अन्वय नाईक’ अशी बॅनरबाजी करत अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेचे समर्थन केले आहे.

महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सातत्याने अर्णव गोस्वामी यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू केली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यावर नाना तऱ्हेचे आरोप करण्याचा सपाटाच अर्णव गोस्वामी यांनी लावला होता. अशात टीआरपी घोटाळ्यात अर्णव गोस्वामी यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याने अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना अटक केली.  

टॅग्स :Anvay Naikअन्वय नाईकPoliceपोलिसarnab goswamiअर्णब गोस्वामीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार