शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणेरी बचाने की जंग में हम सब संग में - जलपुरूष राजेंद्र सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 00:28 IST

आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.

पालघर : आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला वारसा म्हणून शुद्ध पाण्याची तरतूद करणे हेच आपले मुख्य कर्तव्य आहे या शब्दात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ जलपुरु ष डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी पाण्याचे महत्त्व विशद केले.पाणेरी नदी प्रदूषणाविरुद्ध माहीमवासींनी सुरू केलेल्या चळवळीच्या अनुषंगाने सोमवारी आयोजित एका जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. सकाळी पाणेरी नदीच्या उगमापासून शेवटपर्यंतच्या भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर दुपारच्या जाहीर व्याख्यान्यात त्यांनी पानेरी नदीच्या पुनर्जीवितासंबंधी व एकंदर पाणी प्रश्नावर उपस्थितांना संबोधित केले.पाणेरी नदीची स्थिती अत्यंत खराब असून नदीवर होत असलेला अन्याय हा समाजावरील अन्याय म्हणायला हवा कारण नदीच्या आरोग्याशी आपले आरोग्य निगिडत असल्याने नदी आजारी पडल्यास आपणही आजारी पडतो हे सांगताना डॉ. सिंह यांनी गंगा नदीच्या प्रदूषणाचा दाखला दिला. गंगा प्रदूषणामुळे कानपूर ते कनोजपर्यंतच्या भागात भारतातील सर्वाधिक कर्करोग रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा खोटा अहवाल देते. म्हणून सरकारमान्य खाजगी प्रयोगशाळांच्या सहकार्याने नदीतील पाण्याचे नमुने तपासणी करून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला उघडे पाहायला हवे असे आवाहनही डॉ. सिंह यांनी केले. पाणेरी नदीच्या प्रदूषणाविरु द्धच्या आंदोलनात काही प्रमुख मुद्यावर त्यांनी विशेष भर दिला त्यानुसार पाणेरी नदीचे शासन दप्तरी योग्य नामकरण करणे गरजेचे असून पानेरी खाडी असा चुकीच्या उल्लेखात सुधारणा करून ‘पाणेरी नदी’ हा बदल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अधिकार वापरून करावा. यासाठी ग्रामपंचायतीतर्फे निवेदन देणे, पाणेरी नदीची श्वेतिपत्रका तयार करून नदी कोणामुळे, कधीपासून आणि कुठपासून आजारी आहे याची माहिती सर्वांना करून देणे तसेच जिल्हाधिकाऱ्यांंना नदीची ओळख तिचे सीमांकन आणि चिन्हांकन करून घ्यायला भाग पाडणे या मुद्द्यांवर सर्वप्रथम काम करायला हवे असे सांगितले. तसेच नदीवरील अतिक्र मण, प्रदूषण आणि शोषण या तीन संकटांपासून नदीचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघर