शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाणेरी बचाने की जंग में हम सब संग में - जलपुरूष राजेंद्र सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 00:28 IST

आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.

पालघर : आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला वारसा म्हणून शुद्ध पाण्याची तरतूद करणे हेच आपले मुख्य कर्तव्य आहे या शब्दात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ जलपुरु ष डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी पाण्याचे महत्त्व विशद केले.पाणेरी नदी प्रदूषणाविरुद्ध माहीमवासींनी सुरू केलेल्या चळवळीच्या अनुषंगाने सोमवारी आयोजित एका जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. सकाळी पाणेरी नदीच्या उगमापासून शेवटपर्यंतच्या भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर दुपारच्या जाहीर व्याख्यान्यात त्यांनी पानेरी नदीच्या पुनर्जीवितासंबंधी व एकंदर पाणी प्रश्नावर उपस्थितांना संबोधित केले.पाणेरी नदीची स्थिती अत्यंत खराब असून नदीवर होत असलेला अन्याय हा समाजावरील अन्याय म्हणायला हवा कारण नदीच्या आरोग्याशी आपले आरोग्य निगिडत असल्याने नदी आजारी पडल्यास आपणही आजारी पडतो हे सांगताना डॉ. सिंह यांनी गंगा नदीच्या प्रदूषणाचा दाखला दिला. गंगा प्रदूषणामुळे कानपूर ते कनोजपर्यंतच्या भागात भारतातील सर्वाधिक कर्करोग रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा खोटा अहवाल देते. म्हणून सरकारमान्य खाजगी प्रयोगशाळांच्या सहकार्याने नदीतील पाण्याचे नमुने तपासणी करून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला उघडे पाहायला हवे असे आवाहनही डॉ. सिंह यांनी केले. पाणेरी नदीच्या प्रदूषणाविरु द्धच्या आंदोलनात काही प्रमुख मुद्यावर त्यांनी विशेष भर दिला त्यानुसार पाणेरी नदीचे शासन दप्तरी योग्य नामकरण करणे गरजेचे असून पानेरी खाडी असा चुकीच्या उल्लेखात सुधारणा करून ‘पाणेरी नदी’ हा बदल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अधिकार वापरून करावा. यासाठी ग्रामपंचायतीतर्फे निवेदन देणे, पाणेरी नदीची श्वेतिपत्रका तयार करून नदी कोणामुळे, कधीपासून आणि कुठपासून आजारी आहे याची माहिती सर्वांना करून देणे तसेच जिल्हाधिकाऱ्यांंना नदीची ओळख तिचे सीमांकन आणि चिन्हांकन करून घ्यायला भाग पाडणे या मुद्द्यांवर सर्वप्रथम काम करायला हवे असे सांगितले. तसेच नदीवरील अतिक्र मण, प्रदूषण आणि शोषण या तीन संकटांपासून नदीचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघर