शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पाणेरी बचाने की जंग में हम सब संग में - जलपुरूष राजेंद्र सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 00:28 IST

आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.

पालघर : आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला वारसा म्हणून शुद्ध पाण्याची तरतूद करणे हेच आपले मुख्य कर्तव्य आहे या शब्दात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ जलपुरु ष डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी पाण्याचे महत्त्व विशद केले.पाणेरी नदी प्रदूषणाविरुद्ध माहीमवासींनी सुरू केलेल्या चळवळीच्या अनुषंगाने सोमवारी आयोजित एका जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. सकाळी पाणेरी नदीच्या उगमापासून शेवटपर्यंतच्या भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर दुपारच्या जाहीर व्याख्यान्यात त्यांनी पानेरी नदीच्या पुनर्जीवितासंबंधी व एकंदर पाणी प्रश्नावर उपस्थितांना संबोधित केले.पाणेरी नदीची स्थिती अत्यंत खराब असून नदीवर होत असलेला अन्याय हा समाजावरील अन्याय म्हणायला हवा कारण नदीच्या आरोग्याशी आपले आरोग्य निगिडत असल्याने नदी आजारी पडल्यास आपणही आजारी पडतो हे सांगताना डॉ. सिंह यांनी गंगा नदीच्या प्रदूषणाचा दाखला दिला. गंगा प्रदूषणामुळे कानपूर ते कनोजपर्यंतच्या भागात भारतातील सर्वाधिक कर्करोग रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा खोटा अहवाल देते. म्हणून सरकारमान्य खाजगी प्रयोगशाळांच्या सहकार्याने नदीतील पाण्याचे नमुने तपासणी करून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला उघडे पाहायला हवे असे आवाहनही डॉ. सिंह यांनी केले. पाणेरी नदीच्या प्रदूषणाविरु द्धच्या आंदोलनात काही प्रमुख मुद्यावर त्यांनी विशेष भर दिला त्यानुसार पाणेरी नदीचे शासन दप्तरी योग्य नामकरण करणे गरजेचे असून पानेरी खाडी असा चुकीच्या उल्लेखात सुधारणा करून ‘पाणेरी नदी’ हा बदल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अधिकार वापरून करावा. यासाठी ग्रामपंचायतीतर्फे निवेदन देणे, पाणेरी नदीची श्वेतिपत्रका तयार करून नदी कोणामुळे, कधीपासून आणि कुठपासून आजारी आहे याची माहिती सर्वांना करून देणे तसेच जिल्हाधिकाऱ्यांंना नदीची ओळख तिचे सीमांकन आणि चिन्हांकन करून घ्यायला भाग पाडणे या मुद्द्यांवर सर्वप्रथम काम करायला हवे असे सांगितले. तसेच नदीवरील अतिक्र मण, प्रदूषण आणि शोषण या तीन संकटांपासून नदीचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघर