शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

‘ओव्हरलोड’ अवजड वाहनांमुळे अपघात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 11:28 PM

मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे पूर्वी रुंदीकरण, त्यानंतर चौपदरीकरण आणि आता सहापदरीकरण करण्यात आले आहे.

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढल्या असून ‘ओव्हरलोड’मुळे हे प्रकार घडत आहेत. मात्र आरटीओ व वाहतूक नियंत्रण पोलीस अधिकारी व कर्मचारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे पूर्वी रुंदीकरण, त्यानंतर चौपदरीकरण आणि आता सहापदरीकरण करण्यात आले आहे. मात्र तरीही या महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आदी भागांतून आलेले हजारोे ट्रेलर व इतर अवजड वाहने या महामार्गावरून धावतात. ही वाहने मर्यादेपेक्षा जास्त माल भरून नियमांचे उल्लंघन करीत असतात. तसेच अनेक वाहनांची मागची पार्किंग सिग्नल लाईट बंद असते. नंबर प्लेटही नीटपणे दिसत नाही.

पीयूसी असूनही काळा धूर निघतो, अशा अनेक त्रुटी असलेली वाहने या मार्गावरून धावत असल्याचे निदर्शनास येत असते. अशा वाहनांमुळे रात्री तसेच दिवसाही अपघात होत असतात. मात्र तरीही आरटीओ व वाहतूक नियंत्रण पोलीस कारवाई करीत नाहीत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

कारवाई करीत असल्याचा पोलिसांचा दावा

आरटीओचे अधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र वाहतूक नियंत्रण शाखा दुर्वेस येथील सपोनि दिंडे यांच्याशी संपर्क साधला असता, अवजड मोटरवाहनांवर अद्यापपर्यंत भरपूर कारवाई केली आहे व पुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या चालकांवर व मोटर वाहनांवरही कारवाई केली जात आहे, असे असे ते म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्ग