शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:28 PM

जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. गत वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ असून सदर प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामुहिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देविद्या मानकर : सामूहिक उपाययोजना केल्यास अटकाव शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. गत वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ असून सदर प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामुहिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सामुहिक उपाययोजनाच गुलाबी बोंडअळीला अटकाव घालू शकतात, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी दिली.मानकर पुढे म्हणाल्या, गत वर्षीच्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी उत्पादक शेतकरी मेळाकुटीस आला होता. कापूस उत्पादकांना त्यावेळी मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागला. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सुमारे २ लाख २६ हजार ३६३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. एकट्या कृषी विभागाच्या प्रयत्नाने गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला अटकाव करता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक कपाशी उत्पादक शेतकऱ्याने पुढे येत कृषी तज्ज्ञांकडून सुचविलेल्या योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.गत दोन महिन्यांपासून गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून चित्र रथ व ठिकठिकाणी कार्यशाळा घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. फरदड कापूस घेऊ नये, पूर्व हंगामी लागवड करू नये, योग्य वाणाची निवड करावी, पिकांची फेरपालट करावी, दोनपेक्षा अधिक कीटकनाशके मिसळून फवारणी करू आदी विषयांवर या कार्यशाळेत तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. शिवाय सध्याही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. सोमवार १६ जुलैपासून विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कुठलीही अडचण असल्यास तात्काळ तालुका कृषी कार्यालयातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी केले.सोमवारपासून गावपातळीवर शिबिरगुलाबी बोेंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच कपाशी उत्पादकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये गाव पातळीवर विशेष कार्यशाळा व शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. कुठल्याही शेतकऱ्याला अडचण आल्यास त्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्याना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल, असेही यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी केले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी