शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

पाण्याने सर्वांच्याच डोळ्यात आणले ‘पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:53 PM

जिल्ह्यात यंदा जलसंकट तीव्र झाले आहे. यामुळे सर्वत्र नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा पाहायला मिळत आहे. पाण्याणे यंदा नागरिकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. पाणीसंकट आणि उष्णतामानामुळे वैतागलेल्या नागरिकांना आता धो-धो पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देधो-धो पावसाची प्रतीक्षा : प्रखर उष्णतामान अद्याप कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात यंदा जलसंकट तीव्र झाले आहे. यामुळे सर्वत्र नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा पाहायला मिळत आहे. पाण्याणे यंदा नागरिकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. पाणीसंकट आणि उष्णतामानामुळे वैतागलेल्या नागरिकांना आता धो-धो पावसाची प्रतीक्षा आहे.गतवर्षी जिल्ह्याचे अत्यल्प पाऊस झाला. यामुळे जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकला. शहराला पाणीुरवठा करणाऱ्या धाम व महाकाळी धारणात अल्पसा जलसाठा आहे. तर शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाºया येळाकेळी येथील नदीपात्रानेही तळ गाठला आहे. परिणामी, सद्यस्थितीत शहर आणि ग्रामीण भागाला सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात शेतशिवारात उन्हाळवाहीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.मृग नक्षत्राला सुरुवात होऊन चार दिवस झाले आहेत. मृग नक्षत्रापूर्वी आलेल्या वादळी पावसाने ज्ञनेक ग्रामीण भागांना तडाखा दिला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. वीज पडल्याने जनावरे मृत्युमुखी पडली. आता तीन दिवसांपासून प्रखर उष्णतामान असून उकाडा कायम आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. शहरात आणि ग्रामीण भागात पाण्याचे खासगी टँकर सुरू आहेत.मात्र, किती दिवस पाणी विकत घ्यायचे, हा प्रश्न नागरिकांंना भेङसावत आहे. जलाशयांमध्ये २० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. दुसरीकडे पावसाचा मागील तीन ते चार दिवसांपासून पत्ता नाही. त्यामुळे सर्वच जण चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. दररोज सायंकाळी आकाशात मेघ दाटून येत असले तरी पाऊस मात्र येत नाही. त्यामुळे पाणीसमस्या आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवसेंदिवस उकाडाही असह्य होऊ लागला आहे. त्यामुळे जो-तो पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई