शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नागपूर विभागात वर्धा झेडपी अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 6:00 AM

पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सोळा विभागाने विविध कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे प्रथम विभागीय स्तरावर गुणांकन करण्यात आले होते. गुणांकन करणाऱ्या पथकाने त्यांना गुणदान केल्यानंतर वर्धा जिल्हा परिषद विभागातून प्रथम आली होती. त्यानंतर राज्याच्या चमुकडूनही जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे गुणांकन झाले होते.

ठळक मुद्देमुंबईत झाला सन्मान : यशवंत पंचायत राज अभियानात उत्कृष्ट कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून यशवंत पंचायत राज अभियानाची अंमलबजावणी केली जाते. सन २०१८-२०१९ मध्ये वर्धा जिल्हा परिषद नागपूर विभागातून सवोत्कृष्ठ कामगिरी करणाारी पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे गुरुवारी हा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांच्या हस्ते जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सरिता विजय गाखरे, माजी अध्यक्ष नितीन मडावी, उपाध्यक्ष वैशाली जयंत येरावार, आरोग्य व शिक्षण समिती सभापती मृणाल हेमंत माटे, महिला व बालकल्याण समिती सभापती सरस्वती राजू मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सोळा विभागाने विविध कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे प्रथम विभागीय स्तरावर गुणांकन करण्यात आले होते. गुणांकन करणाऱ्या पथकाने त्यांना गुणदान केल्यानंतर वर्धा जिल्हा परिषद विभागातून प्रथम आली होती. त्यानंतर राज्याच्या चमुकडूनही जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे गुणांकन झाले होते.आज नागपूर विभागीय स्तरावर ही जिल्हा परिषद अव्वल आल्याने जिल्ह्याचे नावलौकीक झाले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पदाधिकाºयांचाही काम करण्याचा उत्साह वाढला आहे.स्वच्छ भारत मिशन प्रथम तर समाजकल्याण विभाग शेवटचाविभागीय स्तरावर झालेल्या गुणांकामध्ये जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन विभागाने उत्तम कार्य केले असून या विभागाला सात पैकी सात गुण प्राप्त झाले आहे. यासोबतच आरोग्य विभाग व रोजगार हमी योजनेचेही काम उत्तम राहिले आहे. रोजगार हमी योजनेतून शंभर टक्के रोजगार मिळवून देण्यात आला आहे. शिक्षण विभागाने शंभर टक्के पटनोंदणी, ९७ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करुन देण्यावर भर देण्यासह शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करुन दिल्याने १८ पैकी १७ गुण मिळविले आहे. सामान्य प्रशासन विभागाने नियमित सभेचे कामकाज सांभाळत ४ सभाऐवजी ७ सभांचे आयोजन करणे, सभांमध्ये ९३.९६ टक्के सदस्यांची उपस्थिती, महिला सदस्यांची मोठ्या प्रमाणात सभेला हजेरी, कर्मचारी व्यवस्थापन, विभागीय चौकशी प्रकरणाची अंतीम कार्यवाही आदी कामामध्ये तत्परता दाखविल्याने या विभागाला ६० पैकी ५५.३२ गुण प्राप्त झाले आहे. मात्र, समाजकल्याण विभागातील कामकाज ढेपाळल्याने या विभागाला सर्वात कमी १५ पैकी ८ गुण मिळाले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद