शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

खचलेल्या विहिरींना दुरूस्तीची प्रतीक्षा कायमच

By admin | Updated: December 4, 2014 23:13 IST

गतवर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावातील विहिरी खचल्या. त्या दुरूस्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याकरिता एका विहिरीमागे दीड लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

विजय माहुरे - घोराड
गतवर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावातील विहिरी खचल्या. त्या दुरूस्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याकरिता एका विहिरीमागे दीड लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या विहिरी दुरूस्त करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. असे असताना तालुक्यातच नव्हे संपूर्ण जिल्ह्यात या दृष्टीने कामे होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. एका सेलू तालुक्यात जवळपास ८६ लाभार्थी विहीर दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मुदत संपत असल्याने त्यांच्या विहिरीची दुरूस्ती होईल अथवा नाही, असा प्रश्न त्यांना आता भेडसावत आहे.
२०१३ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात शेतातील अनेक विहिरी खचल्या. त्यांच्या पुरात आलेला गाळही साचला. यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्या निर्माण झाल्या. अतिवृष्टीमुळे खचलेल्या व गाळांनी भरलेल्या विहिरींची दुरूस्ती करण्यासाठी शासनाने २३ मे २०१४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला. या निर्णयानुसार कृषी विभाग व महसूल विभागाला सर्वेक्षण करून तसे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार कृषी सहाय्यक व तलाठी यांनी संयुक्त पंचनामा करून लाभार्थ्यांची यादी तयार केली अन् संबंधीत विभागाला ती सादरही केली. ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविली जाणार असून यात १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे.
ही कामे ग्रामपंचायत व गटस्तरावर करण्यात येणार असून अनुदानाचे विभागाजन ६० व ४० असे करण्यात आले आहे. यात मजुरी व साहित्यावर खर्च होणार आहे. सध्या ही यादी जिल्हा परिषद स्तरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक मग्रारो-२०१४ प्र.क्र.२५/ मग्रारो-१ दि. २३ मे २०१४ च्या निर्णयानुसार खचलेल्या विहिरींच्या दुरूस्तीची कामे ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. पण ही मुदत संपण्यास अवघे काही दिवस उरले आहे. अजूनही शासकीय स्तरावर या विहिरीच्या दुरूस्तीच्या कोणत्याही हालचाली सुरू नाही. यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या विहिरीची दुरूस्ती कशी होणार, याकडे आता लक्ष लागले आहे. मुदतीनंतर दुरूस्ती होणार की नाही, असा नवा प्रश्नही पात्र शेतकऱ्यांपुढे आहे. याकडे संबंधीत विभागाने लक्ष देवून विहिरींची दुरूस्ती करण्याची मागणी आहे.