शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

सीसीआय अन् पणनचे खरेदी केंद्र उघडूनही कापसाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सीसीआयच्या निर्देशानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी केली होती. दिवाळीच्या सुरूवातीला देवळी येथे सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या सर्व भागात खरेदी केंद्र सुरू झाले. शेतकऱ्यांना बाजार समितीतून कापूस आणण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत. मात्र, शेतकरी कापूस आणत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील जवळपास २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने कपाशीचे पीक उपटून टाकले असून त्याठिकाणी चणा किंवा गहू लागवडीची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सीसीआयने खरेदी केला केवळ ५९ हजार क्विंटल कापूस

    लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने यंदा कपाशीच्या उत्पादनात कमालीची घट येत आहे. अनेक शेतकरी कपाशी पीक रोटावेटरच्या सहाय्याने उपटून टाकले आहे. त्यामुळे कापूस पणन महासंघ व सीसीआय या दोघांचीही कापूस खरेदी केंद्र सुरू झाली असतानाही तेथे कापसाची आवक मंदावलेली आहे.अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सीसीआयच्या निर्देशानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी केली होती. दिवाळीच्या सुरूवातीला देवळी येथे सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या सर्व भागात खरेदी केंद्र सुरू झाले. शेतकऱ्यांना बाजार समितीतून कापूस आणण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत. मात्र, शेतकरी कापूस आणत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील जवळपास २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने कपाशीचे पीक उपटून टाकले असून त्याठिकाणी चणा किंवा गहू लागवडीची तयारी सुरू केली आहे. सीसीआयची खरेदी सुरू होऊन आठवडा लोटला आहे. सीसीआयने जिल्ह्यात देवळी बाजारसमितीअंतर्गत २० हजार ३२० क्विंटल, वर्धा बाजार समिती अंतर्गत १० हजार ४६७ क्विंटल, सेलू बाजार समितीअंतर्गत ४ हजार ३५८ क्विंटल, हिंगणघाट बाजार समिती अंतर्गत २० हजार क्विंटल, समुद्रपूर बाजार समिती अंतर्गत ३ हजार ७७० तर आर्वी बाजार समिती अंतर्गत ६०० क्विंटल कापसाची खरेदी शुक्रवारपर्यंत केलेली आहे. जिल्ह्यात कापूस पणन महासंघाचे केंद्र पुलगाव व तळेगाव येथे सुरू झाले आहे. तेथेही अत्यल्प आवक असल्याची माहिती आहे. यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. पहिला वेचा झाल्यानंतर आता दुसरा वेचा शेतकऱ्यांना रोजाने महिला मजूर सांगून करावा लागत आहे. दोन वेच्यानंतर कापूस पट्टयातील अनेक गावात कपाशीची उलंगवाडी होणार आहे. रोजंदारी महिला मजुरांमार्फत कापूस वेचणी परवडणानी नसल्याने अनेकांनी कपाशी काढून टाकली आहे. जिल्ह्यात १ हजार ते १५०० एकरातील कपाशी पीक उपटल्याचे माहिती लोकमतला मिळाली आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादकांकडे केंद्रावर नेण्यासाठी कापूस फार प्रमाणात नाही. शिवाय सीसीआय एवढाच दर खुल्या बाजारात असल्याने अनेक शेतकरी आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना देत आहेत. त्यामुळे सीसीआय आणि पणन महासंघाच्या केंद्रांवर यंदा गर्दी दिसून येत नाही. अनेक शेतकरी कापसाचा भाव वाढेल या आशेवर सध्या कापूस विक्रीच्या मनस्थितीत नाही.

मागील वर्षी ३२.२० लाख क्विंटल कापसाची खरेदीयंदाच्या वर्षी ६२ हजार ६२४ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस खरेदीसाठी नेांदणी केली आहे. शिवाय शुक्रवारपर्यंत केवळ ५९ हजार ५१५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी सीसीआयने जिल्ह्यात ३२ लाख २० हजार ५९० क्विंटल कापसाची खरेदी केली होती. त्या वर्षी कृषी विभागाचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला होता.

 

टॅग्स :cottonकापूस