शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदांसाठी आज मतदान

By admin | Updated: July 21, 2014 23:59 IST

जिल्ह्यातील सहाही पालिकांच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यातूनच नव्या नगराध्यक्षाची निवड होणार आहे. सहा जागांकरिता होत असलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात १७ उमेदवार

प्रत्येक उमेदवारांना आशा : १७ उमेदवार रिंगणात; पक्षांतर्गत बंडामुळे चुरस वाढलीवर्धा: जिल्ह्यातील सहाही पालिकांच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यातूनच नव्या नगराध्यक्षाची निवड होणार आहे. सहा जागांकरिता होत असलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात १७ उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. उमेदवारी दाखल झाल्याच्या तारखेपासून तर मागे घेण्याच्या तारखेपर्यंत लाखोंची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील वर्धा, सिंदी (रेल्वे), देवळी व आर्वी येथील स्थिती काही प्रमाणात स्पष्ट असली तरी पुलगाव व हिंगणघाट येथे मात्र एका पक्षाचे उमेदवार समोरासमोर आहेत. यामुळे खूर्ची कोणाची हे सांगणे कठीण आहे. नामांकन दाखल करण्याच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी जाहीर केली. यात सहाही नगर परिषदेत २० जणांचे अर्ज आले होते. हे अर्ज परत घेण्याची अंतीम तारीख सोमवारी होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज परत घेण्याची वेळ असली तरी केवळ पुलगाव येथील अपक्ष उमेदवार प्रमोद घालाणी व सिंदी (रेल्वे) येथील काँग्रेसच्या अंजली उमाटे यांनी माघार निवडणुकीतून माघार घेतली. यापूर्वीच पुलगावच्या संगीता रामटेके यांचा अर्ज रद्दबातल ठरला होता. पुलगावच्या निवडणुकीत तीन काँग्रेस व एक भाजपचा उमेदवार रिंगणात आहे. या कारणाने चुरस वाढली आहे. हीच स्थिती हिंगणघाट येथे आहे. येथे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या कारणाने येथील गणित स्पष्ट नसल्याचे चित्र आहे. आर्वी येथे काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत आहे. येथे आलेले दोनही अर्ज कायम आहेत. यामुळे येथे नगराध्यक्षपद कुणाच्या वाट्याला येते ते येथील आजी व माजी आमदाराने केलेल्या मोर्चेबांधणीवर अवलंबून आहे. यात कोण बाजी मारेल हे मंगळवारीच समोर येईल. सिंदी रेल्वे येथेही काँग्रेस व भाजप समोरासमोर असून येथे अपक्ष उमेदवारावर नगगराध्यक्षाची भिस्त आहे. वर्धेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस समोरासमोर आहे. येथे भाजप व राष्ट्रवादीची अभद्र युती यावेळीही कायम राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नगराध्यक्षाची खुर्ची राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल, अशी चर्चा आहे. देवळीची स्थिती वेगळी आहे. येथे एकच अर्ज असल्याने निवडणूक अविरोध होणार आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)