शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वर्ध्यात तेल स्वराज्य अभियानातून जवसाचे क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 11:57 IST

यशकथा : पारंपरिक तेल बियाणांचे संवर्धन करण्यासाठी विदर्भ जवस उत्पादक मंडळाची स्थापना करण्यात आली.

- अभिनय खोपडे (वर्धा)

वर्धा येथील मगन संग्रहालय समितीच्या तेल स्वराज्य अभियानांतर्गत पारंपरिक तेल बियाणांचे संवर्धन करण्यासाठी विदर्भ जवस उत्पादक मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळात १०५ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. या शेतकऱ्यांना दरवर्षी जवस बीज वितरण करण्यात येते. यावर्षी जवस उत्पादन क्षेत्र २०० एकरापर्यंत पोहोचले आहे.

सध्या या शेतकऱ्यांचे जवस खरेदी करून तेल प्रक्रिया केली जात आहे. यामुळे बंद पडलेला पारंपरिक तेलघाणी व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात आला. सध्या या तेलाची विक्री महिला बचत समूहाच्या माध्यमातून वर्धा येथून केली जात आहे. या तेलाला बाजारात मोठी मागणी असल्याची माहिती आहे. त्यामुळे जवसाची शेती करण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाची मदत या प्रकल्पामुळे होत आहे.

या केंद्राशी सलग्न असलेल्या नैसर्गिक उत्पादन, विक्री आणि विपणनासाठी वर्धा शहरात मगन संग्रहालय समितीच्या परिसरात मगन मंडी उभारण्यात येत आहे. या माध्यमातून या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतमालाची स्थानिक आणि राज्य पातळीवर खरेदी-विक्री करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारापेक्षा अधिक भाव मिळणार आहे. येत्या काळात ग्राहकांनाही विषमुक्त माल उपलब्ध होणार आहे.

कापूस ते कपडा उत्पादन प्रक्रिया उद्योगपर्यंतची जोडणी या उपक्रमात करण्यात येत आहे. सध्या ५० हेक्टरमध्ये नैसर्गिक कपास उत्पादन करीत असून, शेकडो शेतकरी नैसर्गिक शेतीचे प्रयोग करीत आहेत. नैसर्गिक शेतीला लागणारे बीज, घनामृत, बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क आदी निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण संलग्न शेतकऱ्यांना दिले जात आहे.

विदेशातून येणारे तेल व तेलात होणारी भेसळ यामुळे नागरिकांच्या जीवनाशी छळ केल्या जात आहे. पारंपरिक घाणी बंद पाडणे, हे शासनाचे षड्यंत्रच आहे. शासनाकडून पारंपरिक घाणीला प्रोत्साहन देणाऱ्या कुठल्याच योजना नसल्या तरीही तेल स्वराज्य अभियान हा आमच्या चळवळीचा भाग आहे, असे मगन संग्रहालय समिती, वर्धाच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान, जवसाचे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याच्या पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी, खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात.

बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते, असे औषधीही गुणधर्म आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी