शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वर्ध्यात तेल स्वराज्य अभियानातून जवसाचे क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 11:57 IST

यशकथा : पारंपरिक तेल बियाणांचे संवर्धन करण्यासाठी विदर्भ जवस उत्पादक मंडळाची स्थापना करण्यात आली.

- अभिनय खोपडे (वर्धा)

वर्धा येथील मगन संग्रहालय समितीच्या तेल स्वराज्य अभियानांतर्गत पारंपरिक तेल बियाणांचे संवर्धन करण्यासाठी विदर्भ जवस उत्पादक मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळात १०५ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. या शेतकऱ्यांना दरवर्षी जवस बीज वितरण करण्यात येते. यावर्षी जवस उत्पादन क्षेत्र २०० एकरापर्यंत पोहोचले आहे.

सध्या या शेतकऱ्यांचे जवस खरेदी करून तेल प्रक्रिया केली जात आहे. यामुळे बंद पडलेला पारंपरिक तेलघाणी व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात आला. सध्या या तेलाची विक्री महिला बचत समूहाच्या माध्यमातून वर्धा येथून केली जात आहे. या तेलाला बाजारात मोठी मागणी असल्याची माहिती आहे. त्यामुळे जवसाची शेती करण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाची मदत या प्रकल्पामुळे होत आहे.

या केंद्राशी सलग्न असलेल्या नैसर्गिक उत्पादन, विक्री आणि विपणनासाठी वर्धा शहरात मगन संग्रहालय समितीच्या परिसरात मगन मंडी उभारण्यात येत आहे. या माध्यमातून या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतमालाची स्थानिक आणि राज्य पातळीवर खरेदी-विक्री करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारापेक्षा अधिक भाव मिळणार आहे. येत्या काळात ग्राहकांनाही विषमुक्त माल उपलब्ध होणार आहे.

कापूस ते कपडा उत्पादन प्रक्रिया उद्योगपर्यंतची जोडणी या उपक्रमात करण्यात येत आहे. सध्या ५० हेक्टरमध्ये नैसर्गिक कपास उत्पादन करीत असून, शेकडो शेतकरी नैसर्गिक शेतीचे प्रयोग करीत आहेत. नैसर्गिक शेतीला लागणारे बीज, घनामृत, बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क आदी निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण संलग्न शेतकऱ्यांना दिले जात आहे.

विदेशातून येणारे तेल व तेलात होणारी भेसळ यामुळे नागरिकांच्या जीवनाशी छळ केल्या जात आहे. पारंपरिक घाणी बंद पाडणे, हे शासनाचे षड्यंत्रच आहे. शासनाकडून पारंपरिक घाणीला प्रोत्साहन देणाऱ्या कुठल्याच योजना नसल्या तरीही तेल स्वराज्य अभियान हा आमच्या चळवळीचा भाग आहे, असे मगन संग्रहालय समिती, वर्धाच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान, जवसाचे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याच्या पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी, खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात.

बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते, असे औषधीही गुणधर्म आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी