शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वर्ध्यात तेल स्वराज्य अभियानातून जवसाचे क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 11:57 IST

यशकथा : पारंपरिक तेल बियाणांचे संवर्धन करण्यासाठी विदर्भ जवस उत्पादक मंडळाची स्थापना करण्यात आली.

- अभिनय खोपडे (वर्धा)

वर्धा येथील मगन संग्रहालय समितीच्या तेल स्वराज्य अभियानांतर्गत पारंपरिक तेल बियाणांचे संवर्धन करण्यासाठी विदर्भ जवस उत्पादक मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळात १०५ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. या शेतकऱ्यांना दरवर्षी जवस बीज वितरण करण्यात येते. यावर्षी जवस उत्पादन क्षेत्र २०० एकरापर्यंत पोहोचले आहे.

सध्या या शेतकऱ्यांचे जवस खरेदी करून तेल प्रक्रिया केली जात आहे. यामुळे बंद पडलेला पारंपरिक तेलघाणी व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात आला. सध्या या तेलाची विक्री महिला बचत समूहाच्या माध्यमातून वर्धा येथून केली जात आहे. या तेलाला बाजारात मोठी मागणी असल्याची माहिती आहे. त्यामुळे जवसाची शेती करण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाची मदत या प्रकल्पामुळे होत आहे.

या केंद्राशी सलग्न असलेल्या नैसर्गिक उत्पादन, विक्री आणि विपणनासाठी वर्धा शहरात मगन संग्रहालय समितीच्या परिसरात मगन मंडी उभारण्यात येत आहे. या माध्यमातून या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतमालाची स्थानिक आणि राज्य पातळीवर खरेदी-विक्री करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारापेक्षा अधिक भाव मिळणार आहे. येत्या काळात ग्राहकांनाही विषमुक्त माल उपलब्ध होणार आहे.

कापूस ते कपडा उत्पादन प्रक्रिया उद्योगपर्यंतची जोडणी या उपक्रमात करण्यात येत आहे. सध्या ५० हेक्टरमध्ये नैसर्गिक कपास उत्पादन करीत असून, शेकडो शेतकरी नैसर्गिक शेतीचे प्रयोग करीत आहेत. नैसर्गिक शेतीला लागणारे बीज, घनामृत, बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क आदी निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण संलग्न शेतकऱ्यांना दिले जात आहे.

विदेशातून येणारे तेल व तेलात होणारी भेसळ यामुळे नागरिकांच्या जीवनाशी छळ केल्या जात आहे. पारंपरिक घाणी बंद पाडणे, हे शासनाचे षड्यंत्रच आहे. शासनाकडून पारंपरिक घाणीला प्रोत्साहन देणाऱ्या कुठल्याच योजना नसल्या तरीही तेल स्वराज्य अभियान हा आमच्या चळवळीचा भाग आहे, असे मगन संग्रहालय समिती, वर्धाच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान, जवसाचे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याच्या पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी, खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात.

बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते, असे औषधीही गुणधर्म आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी