शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:37 IST

अस्मानी व सुल्तानी संकट झेलत खरीपातील पिकापासून अधिक उत्पन्न घेण्याची आशा धुळसर झाली आहे. त्यातच रबीच्या पिकातून आर्थिक बाजू मजबूत होईल ही आशा ठेऊन शेतकरी रबी हंगामाला सामोरे जात आहे.

ठळक मुद्देरबीत हरभºयाचा पेरा वाढणार : खरिपाने दिला शेतकºयांना धोका

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : अस्मानी व सुल्तानी संकट झेलत खरीपातील पिकापासून अधिक उत्पन्न घेण्याची आशा धुळसर झाली आहे. त्यातच रबीच्या पिकातून आर्थिक बाजू मजबूत होईल ही आशा ठेऊन शेतकरी रबी हंगामाला सामोरे जात आहे. दोन वेच्यात कपाशीची उलंगवाडीचे चिन्हे दिसत असल्याने हरभºयाच्या पेºयात वाढ होण्याची शक्यता आहे.यंदाच्या वर्षी कापसाला प्रती किलो ४० ते ४२ रूपये भाव मिळत आहे;पण शेतकºयांना पहिल्या वेचणीला कापसाची मजूरी प्रती किलो २० रूपयेच मजूरांना द्यावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यात इतर खर्च पकडल्यास शितदहीचा वेचा शेतकºयांना न परवडणाराच ठरला. शेतकºयांच्या दृष्टीने दिवाळी बोनस म्हणून ओळख असलेल्या सोयाबीननेही यंदा शेतकºयांना धोका दिला. अनेक शेतकºयांना यंदा समाधानकारक उतारे न आल्याचे शेतकरी सांगतात. त्यातही सोयाबीनला सध्या दिल्या जाणारा भाव शेतकºयांची अडचण वाढविणाराच आहे. सोयाबीन पीक घेतल्यानंतर जमीनीतील ओलावा हरभरा या पिकासाठी उपयुक्त ठरणारा असल्याने तसेच बोर प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी सोडण्यास विलंब दिसू लागल्याने बहुतांश शेतकºयांनी कुटुंबीयांची गरज भागविण्यापूर्ती गव्हाच्या पेरणीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. तर काहींनी हरभºयाची लागवड केली आहे. परिणामी, यंदाच्या रबीत हरभºयाच्या पेºयात वाढ झाली आहे. कोरडवाहू शेतातील कपाशी दोन वेचणीतच उलंगवाडी होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविल्या जात आहे. सिंचनासाठी धरणाचे पाणी मिळाल्यास भुईमुंगाचीही लागवड बºयापैकी होईल असेही शेतकरी सांगतात.कपाशीवरील लाल्याने वाढविली अडचणयंदा सोयाबीन व कपाशी आधार देईल, अशी आशा शेतकºयांना असताना सोयाबीनने धोकाच दिला. सध्या कपाशीवर लाल्या या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकºयांची अडचण वाढली आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी अनेक शेतकरी शेतातच रात्रीला मुक्काम करीत असून लाल्या या रोगामुळे उत्पादनात घट येण्याची भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.वितरिकेच्या साफसफाईकडे दुर्लक्षचशेतकºयांना शेतातील पिकांना वेळीच पाणी देता यावे या हेतूने बोर प्रकल्पाचे पाणी सोडल्या जाणार आहे. परंतु, वितरिकेची साफसफाई पाहिजे तरी न करण्यात आल्याने व त्यात काही भागात झुडपे वाढली असल्याने नियोजित वेळेत पाणी नियोजित ठिकाणापर्यंत पोहोचेल काय याबाबत उलट-सुलट परिसरात चर्चा होत आहे. मोजक्याच ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने वितरिका स्वच्छ करण्यात येत आहे. संपूर्ण वितरिका वेळीच स्वच्छ व दुरूस्त करण्याची मागणी आहे.सिंचनासाठी मिळणार धरणाचे पाणीबोर प्रकल्पात जलसाठा यंदा कमी असला तरी शेतकºयांना सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. यंदा केवळ हरभरा पिकासाठी तीन पाळीत पाणी सोडले जाणार असून गव्हासाठी धरणाचे पाणी दिले जाणार नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बोर प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असणारा गव्हाचा पेरा यंदा कमी होण्याची शक्यता आहे. तर भुर्इंमुंग पेरणी पासूनही शेतकºयांना दूर रहावे लागणार आहे.