शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:37 IST

अस्मानी व सुल्तानी संकट झेलत खरीपातील पिकापासून अधिक उत्पन्न घेण्याची आशा धुळसर झाली आहे. त्यातच रबीच्या पिकातून आर्थिक बाजू मजबूत होईल ही आशा ठेऊन शेतकरी रबी हंगामाला सामोरे जात आहे.

ठळक मुद्देरबीत हरभºयाचा पेरा वाढणार : खरिपाने दिला शेतकºयांना धोका

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : अस्मानी व सुल्तानी संकट झेलत खरीपातील पिकापासून अधिक उत्पन्न घेण्याची आशा धुळसर झाली आहे. त्यातच रबीच्या पिकातून आर्थिक बाजू मजबूत होईल ही आशा ठेऊन शेतकरी रबी हंगामाला सामोरे जात आहे. दोन वेच्यात कपाशीची उलंगवाडीचे चिन्हे दिसत असल्याने हरभºयाच्या पेºयात वाढ होण्याची शक्यता आहे.यंदाच्या वर्षी कापसाला प्रती किलो ४० ते ४२ रूपये भाव मिळत आहे;पण शेतकºयांना पहिल्या वेचणीला कापसाची मजूरी प्रती किलो २० रूपयेच मजूरांना द्यावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यात इतर खर्च पकडल्यास शितदहीचा वेचा शेतकºयांना न परवडणाराच ठरला. शेतकºयांच्या दृष्टीने दिवाळी बोनस म्हणून ओळख असलेल्या सोयाबीननेही यंदा शेतकºयांना धोका दिला. अनेक शेतकºयांना यंदा समाधानकारक उतारे न आल्याचे शेतकरी सांगतात. त्यातही सोयाबीनला सध्या दिल्या जाणारा भाव शेतकºयांची अडचण वाढविणाराच आहे. सोयाबीन पीक घेतल्यानंतर जमीनीतील ओलावा हरभरा या पिकासाठी उपयुक्त ठरणारा असल्याने तसेच बोर प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी सोडण्यास विलंब दिसू लागल्याने बहुतांश शेतकºयांनी कुटुंबीयांची गरज भागविण्यापूर्ती गव्हाच्या पेरणीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. तर काहींनी हरभºयाची लागवड केली आहे. परिणामी, यंदाच्या रबीत हरभºयाच्या पेºयात वाढ झाली आहे. कोरडवाहू शेतातील कपाशी दोन वेचणीतच उलंगवाडी होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविल्या जात आहे. सिंचनासाठी धरणाचे पाणी मिळाल्यास भुईमुंगाचीही लागवड बºयापैकी होईल असेही शेतकरी सांगतात.कपाशीवरील लाल्याने वाढविली अडचणयंदा सोयाबीन व कपाशी आधार देईल, अशी आशा शेतकºयांना असताना सोयाबीनने धोकाच दिला. सध्या कपाशीवर लाल्या या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकºयांची अडचण वाढली आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी अनेक शेतकरी शेतातच रात्रीला मुक्काम करीत असून लाल्या या रोगामुळे उत्पादनात घट येण्याची भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.वितरिकेच्या साफसफाईकडे दुर्लक्षचशेतकºयांना शेतातील पिकांना वेळीच पाणी देता यावे या हेतूने बोर प्रकल्पाचे पाणी सोडल्या जाणार आहे. परंतु, वितरिकेची साफसफाई पाहिजे तरी न करण्यात आल्याने व त्यात काही भागात झुडपे वाढली असल्याने नियोजित वेळेत पाणी नियोजित ठिकाणापर्यंत पोहोचेल काय याबाबत उलट-सुलट परिसरात चर्चा होत आहे. मोजक्याच ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने वितरिका स्वच्छ करण्यात येत आहे. संपूर्ण वितरिका वेळीच स्वच्छ व दुरूस्त करण्याची मागणी आहे.सिंचनासाठी मिळणार धरणाचे पाणीबोर प्रकल्पात जलसाठा यंदा कमी असला तरी शेतकºयांना सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. यंदा केवळ हरभरा पिकासाठी तीन पाळीत पाणी सोडले जाणार असून गव्हासाठी धरणाचे पाणी दिले जाणार नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बोर प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असणारा गव्हाचा पेरा यंदा कमी होण्याची शक्यता आहे. तर भुर्इंमुंग पेरणी पासूनही शेतकºयांना दूर रहावे लागणार आहे.