शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:37 IST

अस्मानी व सुल्तानी संकट झेलत खरीपातील पिकापासून अधिक उत्पन्न घेण्याची आशा धुळसर झाली आहे. त्यातच रबीच्या पिकातून आर्थिक बाजू मजबूत होईल ही आशा ठेऊन शेतकरी रबी हंगामाला सामोरे जात आहे.

ठळक मुद्देरबीत हरभºयाचा पेरा वाढणार : खरिपाने दिला शेतकºयांना धोका

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : अस्मानी व सुल्तानी संकट झेलत खरीपातील पिकापासून अधिक उत्पन्न घेण्याची आशा धुळसर झाली आहे. त्यातच रबीच्या पिकातून आर्थिक बाजू मजबूत होईल ही आशा ठेऊन शेतकरी रबी हंगामाला सामोरे जात आहे. दोन वेच्यात कपाशीची उलंगवाडीचे चिन्हे दिसत असल्याने हरभºयाच्या पेºयात वाढ होण्याची शक्यता आहे.यंदाच्या वर्षी कापसाला प्रती किलो ४० ते ४२ रूपये भाव मिळत आहे;पण शेतकºयांना पहिल्या वेचणीला कापसाची मजूरी प्रती किलो २० रूपयेच मजूरांना द्यावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यात इतर खर्च पकडल्यास शितदहीचा वेचा शेतकºयांना न परवडणाराच ठरला. शेतकºयांच्या दृष्टीने दिवाळी बोनस म्हणून ओळख असलेल्या सोयाबीननेही यंदा शेतकºयांना धोका दिला. अनेक शेतकºयांना यंदा समाधानकारक उतारे न आल्याचे शेतकरी सांगतात. त्यातही सोयाबीनला सध्या दिल्या जाणारा भाव शेतकºयांची अडचण वाढविणाराच आहे. सोयाबीन पीक घेतल्यानंतर जमीनीतील ओलावा हरभरा या पिकासाठी उपयुक्त ठरणारा असल्याने तसेच बोर प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी सोडण्यास विलंब दिसू लागल्याने बहुतांश शेतकºयांनी कुटुंबीयांची गरज भागविण्यापूर्ती गव्हाच्या पेरणीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. तर काहींनी हरभºयाची लागवड केली आहे. परिणामी, यंदाच्या रबीत हरभºयाच्या पेºयात वाढ झाली आहे. कोरडवाहू शेतातील कपाशी दोन वेचणीतच उलंगवाडी होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविल्या जात आहे. सिंचनासाठी धरणाचे पाणी मिळाल्यास भुईमुंगाचीही लागवड बºयापैकी होईल असेही शेतकरी सांगतात.कपाशीवरील लाल्याने वाढविली अडचणयंदा सोयाबीन व कपाशी आधार देईल, अशी आशा शेतकºयांना असताना सोयाबीनने धोकाच दिला. सध्या कपाशीवर लाल्या या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकºयांची अडचण वाढली आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी अनेक शेतकरी शेतातच रात्रीला मुक्काम करीत असून लाल्या या रोगामुळे उत्पादनात घट येण्याची भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.वितरिकेच्या साफसफाईकडे दुर्लक्षचशेतकºयांना शेतातील पिकांना वेळीच पाणी देता यावे या हेतूने बोर प्रकल्पाचे पाणी सोडल्या जाणार आहे. परंतु, वितरिकेची साफसफाई पाहिजे तरी न करण्यात आल्याने व त्यात काही भागात झुडपे वाढली असल्याने नियोजित वेळेत पाणी नियोजित ठिकाणापर्यंत पोहोचेल काय याबाबत उलट-सुलट परिसरात चर्चा होत आहे. मोजक्याच ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने वितरिका स्वच्छ करण्यात येत आहे. संपूर्ण वितरिका वेळीच स्वच्छ व दुरूस्त करण्याची मागणी आहे.सिंचनासाठी मिळणार धरणाचे पाणीबोर प्रकल्पात जलसाठा यंदा कमी असला तरी शेतकºयांना सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. यंदा केवळ हरभरा पिकासाठी तीन पाळीत पाणी सोडले जाणार असून गव्हासाठी धरणाचे पाणी दिले जाणार नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बोर प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असणारा गव्हाचा पेरा यंदा कमी होण्याची शक्यता आहे. तर भुर्इंमुंग पेरणी पासूनही शेतकºयांना दूर रहावे लागणार आहे.