शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

रस्ता दुभाजकातील झाडे झाली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:00 AM

शासनाचा मोठा निधी खर्च करून सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. सदर विकास काम सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात आले असून उन्हाळ्याच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता दुभाजकात विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोरील प्रकार : ग्रीन वर्धेच्या उद्देशाला बगल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रीन वर्धा या उद्देशाने वर्धा शहरातील सर्वच उद्यानांचा कायापालट करण्याचा विडा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेने उचलला आहे. परंतु, वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागातील जिल्हा कचेरीसमोरील रस्ता दुभाजकात उन्हाळ्याच्या सुरूवातीला लावण्यात आलेली झाडे अल्पावधीतच बेपत्ता झाल्याने ग्रीन वर्धेच्या उद्देशालाच बगल मिळत आहे. विशेष म्हणजे दुर्लक्षीत धोरण अवलंबल्याने तेथील रोपटे पाण्याअभावी मरण पावल्याचे सांगण्यात येत आहे.प्राप्त माहितीनुसार, शासनाचा मोठा निधी खर्च करून सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. सदर विकास काम सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात आले असून उन्हाळ्याच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता दुभाजकात विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली होती.त्यावेळी या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना ही रोपटे भुरळच घालत होती. परंतु, एक वेळा रोपटे लावले आणि आपण जबाबदारीतून सुटलो याचाच अवलंब करीत लावण्यात आलेल्या रोपट्यांच्या संगोपनाकडे देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे अल्पावधीतच या मार्गावरील रस्ता दुभाजकातील रोपटे मरण पावली. इतकेच नव्हे तर काही झाडांवर मोकाट जनावरांनी ताव मारला. या मार्गाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळा चौक पर्यंतच्या मार्गावरील रस्ता दुभाजकात तातडीने झाड लावण्यात यावे तसेच सदर झाडांच्या संगोपनाची जबाबदारी एखाद्या विभागावर देण्यात यावी, अशी मागणी शहरातील वृक्षप्रेमींची आहे.रस्ता रुंदीकरणात कापली डेरेदार वृक्षडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते महात्मा गांधी पुतळा चौक या मार्गाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाच्या कामादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेली डेरेदार वृक्ष विकासाचे कारण पुढे करून कापण्यात आली. इतकेच नव्हे तर जी रोपटे रस्ता दुभाजकात लावण्यात आली. त्याच्या संगोपनाकडेही दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली गेल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण